शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

परभणीत घरकुल उद्दिष्टपूर्तीला पंचायत समितीचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 19:32 IST

 सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

ठळक मुद्देपरभणी पंचायत समितीअंतर्गत ११७ गावे येतात२०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील ३४३ घरकुले अजूनही पूर्णत्वास गेली नाहीत.

परभणी :  सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने घरकुल योजना राबविली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ पासून इंदिरा गांधी आवास योजनेचे रुपांतर प्रधानमंत्री आवास योजनेत केले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते. प्रत्येक घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ लाख २० हजार  रुपये, नरेगा अंतर्गत १९ हजार रुपये आणि १२ हजार रुपयांचे अनुदान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दिले जाते. एका घरकुलासाठी तिन्ही विभागामार्फत दीड लाख रुपयांचे अनुदान चार हप्त्यात वर्गीकरण करुन दिले जाते.  परभणी पंचायत समितीला दोन वर्षापासून दिलेले उद्दिष्टच पूर्ण करता आले नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये परभणी पंचायत समितीला ४०५ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील ११७ ग्रामपंचायतीतील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सभेमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. निवडलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले. परंतु, पंचायत समितीतील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे ४०५ घरांच्या उद्दिष्टापैकी केवळ २३५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे २०१६-१७ या वर्षातील १७० घरकुले अजूनही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात परभणी पंचायत समिती प्रशासनाला १७३ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. अद्यापपर्यंत एकाही घराचे काम पूर्ण झालेले नाही. १७३ घरांपैकी केवळ ९८ लाभार्थ्यांना घरकाम करण्यासाठी पहिला हप्ता वर्ग झाला आहे. त्यामुळे २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील ३४३ घरकुले अजूनही पूर्णत्वास गेली नाहीत.

दोन वर्षांपासून परभणी पंचायत समिती अंतर्गत घरकुलाचे उद्दीष्ट पूर्ण होत नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी नव्यानेच पदभार घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात पंचायत समितीला आलेली मरगळ दूर होऊन लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होते का, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

११०० पैकी ३२ घरेच पूर्णप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्याला १ हजार ९६ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३२ घरेच पूर्ण झाली आहेत. ६५२ लाभार्थ्याला केवळ पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. ७५ लाभार्थ्याला दुसरा, २१ लाभार्थ्यांना तिसरा तर दोन लाभार्थ्यांंना चौथ्या हप्त्याची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला देण्यात आलेले १ हजार ९६ घरांचे उद्दिष्ट २०१७-१८ या आर्थिक वर्षात पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेचा फटका या योजनेला बसला आहे. त्यामुळे गरजवंत लाभार्थी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वंचित रहात आहेत. 

यावर्षीच्या उद्दिष्टासाठी हालचालीपरभणी पंचायत समितीअंतर्गत ११७ गावे येतात. या गावातील लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वत:चे घर मिळावे, यासाठी शासनाकडे उद्दिष्ट पाठविले जाते. त्यानुसार पंचायत समिती प्रशासनाकडून २०१८-१९ या वर्षातील उद्दिष्टासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.मात्र गेल्या दोन वर्षातील ३४३ घरे अजूनही अपूर्ण आहेत. त्याबाबत वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून दूर जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या योजनेतील उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारHomeघरparabhaniपरभणी