शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

परभणीत घरकुल उद्दिष्टपूर्तीला पंचायत समितीचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 19:32 IST

 सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

ठळक मुद्देपरभणी पंचायत समितीअंतर्गत ११७ गावे येतात२०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील ३४३ घरकुले अजूनही पूर्णत्वास गेली नाहीत.

परभणी :  सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने घरकुल योजना राबविली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ पासून इंदिरा गांधी आवास योजनेचे रुपांतर प्रधानमंत्री आवास योजनेत केले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते. प्रत्येक घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ लाख २० हजार  रुपये, नरेगा अंतर्गत १९ हजार रुपये आणि १२ हजार रुपयांचे अनुदान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दिले जाते. एका घरकुलासाठी तिन्ही विभागामार्फत दीड लाख रुपयांचे अनुदान चार हप्त्यात वर्गीकरण करुन दिले जाते.  परभणी पंचायत समितीला दोन वर्षापासून दिलेले उद्दिष्टच पूर्ण करता आले नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये परभणी पंचायत समितीला ४०५ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील ११७ ग्रामपंचायतीतील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सभेमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. निवडलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले. परंतु, पंचायत समितीतील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे ४०५ घरांच्या उद्दिष्टापैकी केवळ २३५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे २०१६-१७ या वर्षातील १७० घरकुले अजूनही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात परभणी पंचायत समिती प्रशासनाला १७३ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. अद्यापपर्यंत एकाही घराचे काम पूर्ण झालेले नाही. १७३ घरांपैकी केवळ ९८ लाभार्थ्यांना घरकाम करण्यासाठी पहिला हप्ता वर्ग झाला आहे. त्यामुळे २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील ३४३ घरकुले अजूनही पूर्णत्वास गेली नाहीत.

दोन वर्षांपासून परभणी पंचायत समिती अंतर्गत घरकुलाचे उद्दीष्ट पूर्ण होत नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी नव्यानेच पदभार घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात पंचायत समितीला आलेली मरगळ दूर होऊन लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होते का, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

११०० पैकी ३२ घरेच पूर्णप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्याला १ हजार ९६ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३२ घरेच पूर्ण झाली आहेत. ६५२ लाभार्थ्याला केवळ पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. ७५ लाभार्थ्याला दुसरा, २१ लाभार्थ्यांना तिसरा तर दोन लाभार्थ्यांंना चौथ्या हप्त्याची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला देण्यात आलेले १ हजार ९६ घरांचे उद्दिष्ट २०१७-१८ या आर्थिक वर्षात पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेचा फटका या योजनेला बसला आहे. त्यामुळे गरजवंत लाभार्थी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वंचित रहात आहेत. 

यावर्षीच्या उद्दिष्टासाठी हालचालीपरभणी पंचायत समितीअंतर्गत ११७ गावे येतात. या गावातील लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वत:चे घर मिळावे, यासाठी शासनाकडे उद्दिष्ट पाठविले जाते. त्यानुसार पंचायत समिती प्रशासनाकडून २०१८-१९ या वर्षातील उद्दिष्टासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.मात्र गेल्या दोन वर्षातील ३४३ घरे अजूनही अपूर्ण आहेत. त्याबाबत वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून दूर जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या योजनेतील उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारHomeघरparabhaniपरभणी