शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

परभणीत घरकुल उद्दिष्टपूर्तीला पंचायत समितीचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 19:32 IST

 सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

ठळक मुद्देपरभणी पंचायत समितीअंतर्गत ११७ गावे येतात२०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील ३४३ घरकुले अजूनही पूर्णत्वास गेली नाहीत.

परभणी :  सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने घरकुल योजना राबविली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ पासून इंदिरा गांधी आवास योजनेचे रुपांतर प्रधानमंत्री आवास योजनेत केले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते. प्रत्येक घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ लाख २० हजार  रुपये, नरेगा अंतर्गत १९ हजार रुपये आणि १२ हजार रुपयांचे अनुदान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दिले जाते. एका घरकुलासाठी तिन्ही विभागामार्फत दीड लाख रुपयांचे अनुदान चार हप्त्यात वर्गीकरण करुन दिले जाते.  परभणी पंचायत समितीला दोन वर्षापासून दिलेले उद्दिष्टच पूर्ण करता आले नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये परभणी पंचायत समितीला ४०५ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील ११७ ग्रामपंचायतीतील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सभेमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. निवडलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले. परंतु, पंचायत समितीतील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे ४०५ घरांच्या उद्दिष्टापैकी केवळ २३५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे २०१६-१७ या वर्षातील १७० घरकुले अजूनही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात परभणी पंचायत समिती प्रशासनाला १७३ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. अद्यापपर्यंत एकाही घराचे काम पूर्ण झालेले नाही. १७३ घरांपैकी केवळ ९८ लाभार्थ्यांना घरकाम करण्यासाठी पहिला हप्ता वर्ग झाला आहे. त्यामुळे २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील ३४३ घरकुले अजूनही पूर्णत्वास गेली नाहीत.

दोन वर्षांपासून परभणी पंचायत समिती अंतर्गत घरकुलाचे उद्दीष्ट पूर्ण होत नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी नव्यानेच पदभार घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात पंचायत समितीला आलेली मरगळ दूर होऊन लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होते का, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

११०० पैकी ३२ घरेच पूर्णप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्याला १ हजार ९६ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३२ घरेच पूर्ण झाली आहेत. ६५२ लाभार्थ्याला केवळ पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. ७५ लाभार्थ्याला दुसरा, २१ लाभार्थ्यांना तिसरा तर दोन लाभार्थ्यांंना चौथ्या हप्त्याची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला देण्यात आलेले १ हजार ९६ घरांचे उद्दिष्ट २०१७-१८ या आर्थिक वर्षात पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेचा फटका या योजनेला बसला आहे. त्यामुळे गरजवंत लाभार्थी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वंचित रहात आहेत. 

यावर्षीच्या उद्दिष्टासाठी हालचालीपरभणी पंचायत समितीअंतर्गत ११७ गावे येतात. या गावातील लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वत:चे घर मिळावे, यासाठी शासनाकडे उद्दिष्ट पाठविले जाते. त्यानुसार पंचायत समिती प्रशासनाकडून २०१८-१९ या वर्षातील उद्दिष्टासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.मात्र गेल्या दोन वर्षातील ३४३ घरे अजूनही अपूर्ण आहेत. त्याबाबत वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून दूर जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या योजनेतील उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारHomeघरparabhaniपरभणी