शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

'अडचणीवर मात केली आणि सेंद्रिय शेतीच केली'; बाबासाहेब रणेर यांना कृषीभूषण पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 19:24 IST

महाराष्ट्र शासनाकडून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

पाथरी : तालुक्यातील बाभळगाव  येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब   तात्यासाहेब रणेर यांना महाराष्ट्र शासनाचा 2018 चा कृषीभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने बुधवारी याची माहिती दिली. राज्यात कृषी कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 

महाराष्ट्र शासनाकडून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामध्ये पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या बाबासाहेब तात्याराव रणेर यांना २०१८ साठी सेंद्रियशेती गटात कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे .बाबासाहेब रणेर यांना बाभळगाव शिवारामध्ये एक हेक्टर जमीन आहे. यामध्ये ते  ऊस , सोयाबीन पिके सेंद्रिय पद्धतीने घेत असतात. रणेर यांनी २०११ - १२ मध्ये भरतेश्वर शेतकरी गटाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी काकडी ,मिरची  व सघन पद्धतीने कापूस लागवड इत्यादी प्रयोग केले. यातून  गटातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. या कार्यासाठी २०१३ - १४ चा प्रकल्प आत्माकडून दिला जाणारा उत्कृष्ट गटाचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

यानंतर त्यांनी २० शेतकऱ्यांना घेत झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबीर याद्वारे सेंद्रिय शेतीसाठीचे प्रशिक्षण घेतले. पुढे चालून या सर्वांनी मिळून सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी गोवर्धन सेंद्रिय गटाची स्थापना केली आहे. गटामुळे त्यांना एकत्रित  प्रशिक्षण व अभ्यास दौरे यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा  व तंत्रज्ञान शिकण्यासाठी मदत झाली. त्यांनी स्वतः गटातील शेतकऱ्यांना गांडूळ युनिट उभारणीसाठी पुढाकार घेत मदत केली. जीवामृत ,बीजामृत व दशपर्णी अर्क इत्यादी सेंद्रिय शेती साठी आवश्यक बाबींचा ते स्वतःच्या शेतीमध्ये वापर करत असतात. यातून अडीच एकर क्षेत्रात कमी गुंतवणुकीतून आधीचा नफा त्यांना मिळाला लागला आहे. हीच गोष्ट त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या शेतावर राबवल्याने त्यांच्याही उत्पादनात आता वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

सुरुवातीला बाबासाहेब रणेर यांच्यासह गटातील शेतकऱ्यांना उत्पादन घेण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. यावर मात करत त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा मार्ग अवलंबला यातून जमिनीचे आरोग्य सुधारले, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले तसेच जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली असल्याचा अनुभव यावेळी बोलताना सांगितला. त्यांच्या या कार्याची दखल घेत  महाराष्ट्र शासनाचा सेंद्रीय शेती क्षेत्रात दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला असून याबद्दल तालुक्यातील शेतकरी , गटशेतीतील शेतकरी सदस्य व कृषी विभागातील अधिकारी तसेच प्रकल्प आत्माच्या वतीने अभिनंदन होत आहे .

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी