शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ अर्धा टक्काच पीक कर्ज वाटप; बँकांच्या उदासीनतेने दरवर्षी घटतेय टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:45 IST

केवळ ५१३ शेतकऱ्यांनाच लाभ

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज

- मारोती जुंबडे

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत बँकांच्या उदासिन भूमिकेमुळे केवळ ०.४२ टक्केच पीक कर्ज वाटप करून ५१३ शेतकऱ्यांनाच लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामा पाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्जाचे उद्दिष्ट बँकांकडून पूर्ण करण्यात येते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने १६५५ कोटी २० लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयकृत बँकांना दिले होते. या बँकांनी मात्र केवळ ६४.५८ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करीत १ लाख ५४ हजार ८७५ शेतकऱ्यांना लाभ दिला. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले होते. खरीप हंगामात हातातोंडाशी आलेले पीक सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यामुळे आता रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत आवश्यकता आहे. 

जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन यावर्षी सर्वाधिक ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या दिवाळी सणाच्या धामधुमीत बँकांच्या दारामध्ये रबी हंगामाचे पीक कर्ज घेण्यासाठी उभा आहे; परंतु, बँकांनी आतापर्यंत केवळ ०.४२ टक्केच पीक कर्ज वाटप करीत ५१३ शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचा लाभ दिला आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांनी ३१३ शेतकऱ्यांना २ कोटी ५७ लाखांचे पीक कर्ज वाटप करीत ०.९९ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. खाजगी बँकांनी ९९ शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ४.५९ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेने ९७ शेतकऱ्यांना ४४ लाखांचे पीक कर्ज वाटप करीत बँकेला दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ ०.४० टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेला आतापर्यंत रबी हंगामातील पीक कर्ज वाटपास मुहूर्तच मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी घटतेय टक्केवारी२०१६-१७ हे वर्ष सोडले तर दरवर्षी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाच्या टक्केवारीचा आलेख घसरताच राहिला आहे. २०१६-१७ मध्ये १४०८ कोटी ८६ लाखांचे वाटप करीत १०८ टक्के पीक कर्जाचे वाटप केले होते. त्यानंतर २०१९-२० या वर्षात २२ टक्केचपीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यानंतर २०२०-२१ मध्ये ६४.५८ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले. सध्या रबी हंगामात तर ०.४२ टक्केच पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे. त्यामुळे दरवर्षी पीक कर्ज वाटपाची टक्केवारी घसरत आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक