शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

केवळ अर्धा टक्काच पीक कर्ज वाटप; बँकांच्या उदासीनतेने दरवर्षी घटतेय टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:45 IST

केवळ ५१३ शेतकऱ्यांनाच लाभ

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज

- मारोती जुंबडे

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत बँकांच्या उदासिन भूमिकेमुळे केवळ ०.४२ टक्केच पीक कर्ज वाटप करून ५१३ शेतकऱ्यांनाच लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामा पाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्जाचे उद्दिष्ट बँकांकडून पूर्ण करण्यात येते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने १६५५ कोटी २० लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयकृत बँकांना दिले होते. या बँकांनी मात्र केवळ ६४.५८ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करीत १ लाख ५४ हजार ८७५ शेतकऱ्यांना लाभ दिला. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले होते. खरीप हंगामात हातातोंडाशी आलेले पीक सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यामुळे आता रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत आवश्यकता आहे. 

जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन यावर्षी सर्वाधिक ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या दिवाळी सणाच्या धामधुमीत बँकांच्या दारामध्ये रबी हंगामाचे पीक कर्ज घेण्यासाठी उभा आहे; परंतु, बँकांनी आतापर्यंत केवळ ०.४२ टक्केच पीक कर्ज वाटप करीत ५१३ शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचा लाभ दिला आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांनी ३१३ शेतकऱ्यांना २ कोटी ५७ लाखांचे पीक कर्ज वाटप करीत ०.९९ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. खाजगी बँकांनी ९९ शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ४.५९ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेने ९७ शेतकऱ्यांना ४४ लाखांचे पीक कर्ज वाटप करीत बँकेला दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ ०.४० टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेला आतापर्यंत रबी हंगामातील पीक कर्ज वाटपास मुहूर्तच मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी घटतेय टक्केवारी२०१६-१७ हे वर्ष सोडले तर दरवर्षी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाच्या टक्केवारीचा आलेख घसरताच राहिला आहे. २०१६-१७ मध्ये १४०८ कोटी ८६ लाखांचे वाटप करीत १०८ टक्के पीक कर्जाचे वाटप केले होते. त्यानंतर २०१९-२० या वर्षात २२ टक्केचपीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यानंतर २०२०-२१ मध्ये ६४.५८ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले. सध्या रबी हंगामात तर ०.४२ टक्केच पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे. त्यामुळे दरवर्षी पीक कर्ज वाटपाची टक्केवारी घसरत आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक