शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

केवळ पाच टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

परभणी : कोरोनाच्या लसीकरणासाठी जिल्हाभरात जनजागृती केली जात असताना केवळ पाच टक्के नागरिकांना दोन्ही डोस देण्यात प्रशासनाला यश आले ...

परभणी : कोरोनाच्या लसीकरणासाठी जिल्हाभरात जनजागृती केली जात असताना केवळ पाच टक्के नागरिकांना दोन्ही डोस देण्यात प्रशासनाला यश आले आहे. लसीकरणाची ही गती लक्षात घेता, यापुढे लसीकरणाचा वेग वाढला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोनाच्या दोन्ही लसी उपलब्ध झाल्या. त्यानंतर हळूहळू लसीकरण सुरू करण्यात आले; परंतु या लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २१ लाख ६२ हजार १२६ एवढी असून, या लोकसंख्येच्या ७५ टक्के म्हणजे १६ लाख ८ हजार ८३८ नागरिकांना दोन्ही डोस देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने समोर ठेवले आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत चार लाख १५ हजार ७४५ नागरिकांनीच ही लस घेतली आहे. त्यातही ३ लाख ३४ हजार ६६३ (२१ टक्के) नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ८१ हजार ८२ नागरिकांनी (५ टक्के) दोन्ही डोस घेतले आहेत. दोन्ही डोस घेतल्यानंतरच कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण होते; परंतु दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या केवळ पाच टक्के एवढीच आहे. लसीकरणाची ही गती पाहता आरोग्य यंत्रणा जनजागृती करण्यात कमी पडल्याचे समोर येत आहे. नागरिक लसीकरणासाठी का पुढे येत नाहीत? याविषयी व आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. लसीकरणाची ही संथ गती पाहता तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील १८ वर्षांपुढील ७५ टक्के नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. तसे निर्देश राज्य स्तरावरून देण्यात आले आहेत; परंतु जिल्ह्यात अजूनही लसीकरणाची गती वाढत नाही.

सध्याची लसीकरणाची आकडेवारी ही समाधानकारक नसून, ग्रामीण भागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिक त्यांचे लसीकरण करून घ्यावे, अन्यथा अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिला आहे.

कर्मचाऱ्यांमध्येही उदासीनता

एकीकडे अधिकारी-कर्मचारी नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करीत असताना कर्मचाऱ्यांमध्ये लस घेण्याबाबत उदासीनता असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील ४७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत; तर फ्रंटलाइन वर्कर असलेल्या ४६ टक्के कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दोन्ही डोस घेण्याबाबत उदासीनता असल्याचे दिसत आहे.

लस न घेणाऱ्यांची होणार यादी

जिल्ह्यात दोन्ही डोस न घेतलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. विभागप्रमुखांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले का, याची माहिती घ्यावी. लसीकरण न केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी कळवावी. त्याचप्रमाणे महसूल, पंचायत, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियोजित लसीकरण असलेल्या गावांत उपस्थित राहून नागरिकांच्या गृहभेटी घ्याव्यात. नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे आणि १८ वर्षांवरील ७५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे. उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास गावातील संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.