शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

परभणी जिल्ह्यात बसविले केवळ १४०० सौर कृषीपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:43 IST

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत़ त्यापैकी आतापर्यत ५ हजार ८१७ शेतकऱ्यांचेच प्रस्ताव मंजूर करून सौर कृषी पंप कंपन्यांनी केवळ १४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंपाचा लाभ दिला आहे़ त्यामुळे ८ हजार ९३४ शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत़ त्यापैकी आतापर्यत ५ हजार ८१७ शेतकऱ्यांचेच प्रस्ताव मंजूर करून सौर कृषी पंप कंपन्यांनी केवळ १४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंपाचा लाभ दिला आहे़ त्यामुळे ८ हजार ९३४ शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेत आहेत.जिल्ह्यामध्ये ९२ हजार कृषीपंप धारक आहेत़ या कृषीपंपांना वीज वितरण कंपनीच्या १० उपविभागांतर्गत वीज पुरवठा केला जातो; परंतु, जिल्ह्यात १३२ केंद्रांची संख्या बोटावर मोजण्या इतकी असल्याने जिल्ह्यातील ३३ केव्ही उपकेंद्रांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही़ परिणामी कृषीपंपधारकांना सुरळीत वीज पुरवठयासाठी रात्र-रात्र वाट पहावी लागते़ विशेष म्हणजे दिवसभर सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकºयांना नाईलाजास्तव रात्रीच्या वेळी आपल्या शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते़ पाणी देण्याचे काम करीत असताना अनेक शेतकºयांना साप, विंचू आदींनी दंश केल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले़ या घटनांना आळा घालण्यासाठी व शेतकºयांना दिवसभर सुरळीत वीज पुरवठा मिळण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली़सौर कृषीपंप योजना शेतकºयांच्या हिताची असल्याने वीज वितरण कंपनीनेही ग्रामीण भागात जावून या योजनेबाबत जनजागृती केली. शेतकºयांनीही मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद दिला़ आॅनलाईन प्रणालीच्या माध्यामातून जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकºयांनी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल केले़ त्यापैकी ५ हजार ८१७ प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली़ मंजुरी दिलेल्या प्रस्तावांना टाटा पॉवर सोलार, सीआरआय पंप, रविंद्रा एनर्जी, मुद्रा सोलार, जैन इरीगेशन या सौर कंपन्यांची निवडही करण्यात आली़या कंपन्यांकडून लाभार्थी शेतकºयांना सौर कृषीपंप त्यांच्या शेतात उभारून देण्यात येत आहेत; परंतु, कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने ही योजना सुरू होवून वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी १० हजार ३४४ शेतकºयांपैकी केवळ १ हजार ४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंप उभारून देण्यात आले आहेत़ उर्वरित ८ हजार ९३४ शेतकरी अद्यापही लाभाच्या प्रतीक्षेत आहेत़ याबाबत लाभार्थी शेतकरी वीज वितरण कंपनीकडे लाभ का मिळत नाही? याबाबत हेलपाटे मारून विचारणा करीत आहेत; परंतु, आमच्या हाती काहीच नसून सर्व आॅनलाईन आहे़ त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाशीच याबाबत विचारणा करावी, असे प्रत्युत्तर मिळत असल्याने लाभार्थी कृषीपंपधारक हैराण झाले आहेत़याकडे नव्याने रुजू झालेल्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष देवून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकºयांना येणाºया अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांतून होत आहे़एजन्सी निवडीचा पर्याय कधी बंद; कधी सुरू!४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकºयांना परिपूर्ण प्रस्तावांसह आॅनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावयाचा आहे़ अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी ज्या कंपनीकडून सौर कृषीपंप आपल्या शेतात बसून घ्यायाचा आहे़ त्या कंपनीची निवड करणे अपेक्षित आहे; परंतु, आॅनलाईन प्रणालीवर एजन्सी निवडण्याचा पर्याय दुसºया टप्प्यामध्ये केवळ आठच दिवस सुरू राहिला़ त्यानंतर हा पर्याय कधी बंद तर कधी सुरू राहत आहे़ त्यामुळे या पर्यायाच्या लपंडावाने लाभार्थी शेतकरी हैराण झाले आहेत़ जवळपास १८ हजारांचा लोकवाटा भरूनही आपल्याला लाभ मिळतो की नाही? या विवंचनेत सध्या शेतकरी दिसून येत आहेत़३ हजार ९२० प्रस्ताव अपात्र४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत वीज वितरण कंपनीकडे जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत १० हजार ३४४ प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी ५ हजार ९४४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ विशेष म्हणजे ३ हजार ९२० प्रस्ताव वेगवेगळ्या कारणांनी अपात्र ठरविले आहेत़ त्यामुळे या प्रस्तावांतील त्रूटी दूर करून अपात्र करण्यात आलेले प्रस्ताव तत्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा, अशीही मागणी लाभार्थ्यांतून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेती