शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

परभणी जिल्ह्यात बसविले केवळ १४०० सौर कृषीपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:43 IST

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत़ त्यापैकी आतापर्यत ५ हजार ८१७ शेतकऱ्यांचेच प्रस्ताव मंजूर करून सौर कृषी पंप कंपन्यांनी केवळ १४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंपाचा लाभ दिला आहे़ त्यामुळे ८ हजार ९३४ शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत़ त्यापैकी आतापर्यत ५ हजार ८१७ शेतकऱ्यांचेच प्रस्ताव मंजूर करून सौर कृषी पंप कंपन्यांनी केवळ १४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंपाचा लाभ दिला आहे़ त्यामुळे ८ हजार ९३४ शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेत आहेत.जिल्ह्यामध्ये ९२ हजार कृषीपंप धारक आहेत़ या कृषीपंपांना वीज वितरण कंपनीच्या १० उपविभागांतर्गत वीज पुरवठा केला जातो; परंतु, जिल्ह्यात १३२ केंद्रांची संख्या बोटावर मोजण्या इतकी असल्याने जिल्ह्यातील ३३ केव्ही उपकेंद्रांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही़ परिणामी कृषीपंपधारकांना सुरळीत वीज पुरवठयासाठी रात्र-रात्र वाट पहावी लागते़ विशेष म्हणजे दिवसभर सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकºयांना नाईलाजास्तव रात्रीच्या वेळी आपल्या शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते़ पाणी देण्याचे काम करीत असताना अनेक शेतकºयांना साप, विंचू आदींनी दंश केल्याने मृत्यूला सामोरे जावे लागले़ या घटनांना आळा घालण्यासाठी व शेतकºयांना दिवसभर सुरळीत वीज पुरवठा मिळण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली़सौर कृषीपंप योजना शेतकºयांच्या हिताची असल्याने वीज वितरण कंपनीनेही ग्रामीण भागात जावून या योजनेबाबत जनजागृती केली. शेतकºयांनीही मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद दिला़ आॅनलाईन प्रणालीच्या माध्यामातून जिल्ह्यातील १० हजार ३४४ शेतकºयांनी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल केले़ त्यापैकी ५ हजार ८१७ प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली़ मंजुरी दिलेल्या प्रस्तावांना टाटा पॉवर सोलार, सीआरआय पंप, रविंद्रा एनर्जी, मुद्रा सोलार, जैन इरीगेशन या सौर कंपन्यांची निवडही करण्यात आली़या कंपन्यांकडून लाभार्थी शेतकºयांना सौर कृषीपंप त्यांच्या शेतात उभारून देण्यात येत आहेत; परंतु, कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने ही योजना सुरू होवून वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी १० हजार ३४४ शेतकºयांपैकी केवळ १ हजार ४१० शेतकºयांनाच सौर कृषीपंप उभारून देण्यात आले आहेत़ उर्वरित ८ हजार ९३४ शेतकरी अद्यापही लाभाच्या प्रतीक्षेत आहेत़ याबाबत लाभार्थी शेतकरी वीज वितरण कंपनीकडे लाभ का मिळत नाही? याबाबत हेलपाटे मारून विचारणा करीत आहेत; परंतु, आमच्या हाती काहीच नसून सर्व आॅनलाईन आहे़ त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाशीच याबाबत विचारणा करावी, असे प्रत्युत्तर मिळत असल्याने लाभार्थी कृषीपंपधारक हैराण झाले आहेत़याकडे नव्याने रुजू झालेल्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष देवून मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकºयांना येणाºया अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांतून होत आहे़एजन्सी निवडीचा पर्याय कधी बंद; कधी सुरू!४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकºयांना परिपूर्ण प्रस्तावांसह आॅनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावयाचा आहे़ अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी ज्या कंपनीकडून सौर कृषीपंप आपल्या शेतात बसून घ्यायाचा आहे़ त्या कंपनीची निवड करणे अपेक्षित आहे; परंतु, आॅनलाईन प्रणालीवर एजन्सी निवडण्याचा पर्याय दुसºया टप्प्यामध्ये केवळ आठच दिवस सुरू राहिला़ त्यानंतर हा पर्याय कधी बंद तर कधी सुरू राहत आहे़ त्यामुळे या पर्यायाच्या लपंडावाने लाभार्थी शेतकरी हैराण झाले आहेत़ जवळपास १८ हजारांचा लोकवाटा भरूनही आपल्याला लाभ मिळतो की नाही? या विवंचनेत सध्या शेतकरी दिसून येत आहेत़३ हजार ९२० प्रस्ताव अपात्र४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत वीज वितरण कंपनीकडे जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत १० हजार ३४४ प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यापैकी ५ हजार ९४४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ विशेष म्हणजे ३ हजार ९२० प्रस्ताव वेगवेगळ्या कारणांनी अपात्र ठरविले आहेत़ त्यामुळे या प्रस्तावांतील त्रूटी दूर करून अपात्र करण्यात आलेले प्रस्ताव तत्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा, अशीही मागणी लाभार्थ्यांतून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेती