शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

'....खात्यावर फक्त २६ रुपये आहेत'; पीक विम्यासाठी उद्विग्न शेतकऱ्याचा झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:01 IST

तीन वर्षापासून पीकविमा मिळत नसल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

ठळक मुद्दे मागील तीन वर्षांपासून पीक विमा कंपनीकडे विमा भरत आहेत. पैसे भरुनही हक्काचा विमा मिळत नसल्याने टोकाचे पाउल पोलिसांनी समजूत काढून परावृत्त केले

परभणी- तीन वर्षापासून पीक विमा मिळत नसल्याने उद्विग्न झालेल्या एका शेतकऱ्याने दोरखंड घेऊन झाडावर चढत आंदोलन केल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परभणी शहरातील बाजार समितीच्या कार्यालय परिसरात घडली.

तालुक्यातील बोरवंड येथील नरहरी तुकाराम यादव हे मागील तीन वर्षांपासून पीक विमा कंपनीकडे विमा भरत आहेत. तीनही वर्षामध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले. कधी दुष्काळामुळे तर कधी पावसामुळे पीक हाती आले नाही. पैसे भरुनही हक्काचा विमा मिळत नसल्याने  अखेर सोमवारी सकाळी ११ वाजता झाडावर चढून नरहरी यादव यांनी हे आंदोलन केले. ही माहिती या कार्यालयाच्या बाजुस असलेल्या कोतवाली पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नरहरी यादव यांच्याशी चव्हाण यांनी संवाद साधत, त्यांची समजूत काढली.  अर्ध्या तासांनी यादव झाडावरुन खाली उतरले.

२०१७ पासून विमा कंपनीकडे विमा भरत आहे. शेतातील पिकाचे नुकसान होत असतानाही विमा रक्कम मिळत नाही. एक हेक्टर शेती असून दरवर्षी सोयाबीन आणि कापसाचा विमा भरला आहे.मात्र प्रशासन माझ्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचे नरहरी यादव यांनी सांगितले. तसेच आता खात्यावर फक्त २६ रुपये आहेत, पोराचे शिक्षण कस करायचे अशी हतबलता यादव यांनी मांडली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCrop Insuranceपीक विमाparabhaniपरभणी