शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

'....खात्यावर फक्त २६ रुपये आहेत'; पीक विम्यासाठी उद्विग्न शेतकऱ्याचा झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:01 IST

तीन वर्षापासून पीकविमा मिळत नसल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

ठळक मुद्दे मागील तीन वर्षांपासून पीक विमा कंपनीकडे विमा भरत आहेत. पैसे भरुनही हक्काचा विमा मिळत नसल्याने टोकाचे पाउल पोलिसांनी समजूत काढून परावृत्त केले

परभणी- तीन वर्षापासून पीक विमा मिळत नसल्याने उद्विग्न झालेल्या एका शेतकऱ्याने दोरखंड घेऊन झाडावर चढत आंदोलन केल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परभणी शहरातील बाजार समितीच्या कार्यालय परिसरात घडली.

तालुक्यातील बोरवंड येथील नरहरी तुकाराम यादव हे मागील तीन वर्षांपासून पीक विमा कंपनीकडे विमा भरत आहेत. तीनही वर्षामध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले. कधी दुष्काळामुळे तर कधी पावसामुळे पीक हाती आले नाही. पैसे भरुनही हक्काचा विमा मिळत नसल्याने  अखेर सोमवारी सकाळी ११ वाजता झाडावर चढून नरहरी यादव यांनी हे आंदोलन केले. ही माहिती या कार्यालयाच्या बाजुस असलेल्या कोतवाली पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नरहरी यादव यांच्याशी चव्हाण यांनी संवाद साधत, त्यांची समजूत काढली.  अर्ध्या तासांनी यादव झाडावरुन खाली उतरले.

२०१७ पासून विमा कंपनीकडे विमा भरत आहे. शेतातील पिकाचे नुकसान होत असतानाही विमा रक्कम मिळत नाही. एक हेक्टर शेती असून दरवर्षी सोयाबीन आणि कापसाचा विमा भरला आहे.मात्र प्रशासन माझ्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचे नरहरी यादव यांनी सांगितले. तसेच आता खात्यावर फक्त २६ रुपये आहेत, पोराचे शिक्षण कस करायचे अशी हतबलता यादव यांनी मांडली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCrop Insuranceपीक विमाparabhaniपरभणी