शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

लॉकडाऊनमध्ये परभणी जिल्ह्यात अवघी 205 चारित्र्य प्रमाणपत्रे वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 18:59 IST

कंपनी, एखादा उद्याेग, कर्मचारी भरती, परदेशवारी आणि न्यायालयीन व निवडणुकीसाठी चारित्र्य प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

ठळक मुद्देअनलॉकनंतर वाढला ओघ आठ महिन्यांत १६५४ प्रमाणपत्र

परभणी : लॉकडाऊन काळातील एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये संपूर्ण व्यवहारच ठप्प असल्याने त्याचा परिणाम चारित्र्य प्रमाणपत्राच्या कामावर झाला आहे. तीन महिन्यांमध्ये केवळ २०५ जणांचे चारित्र्य प्रमाणपत्र ऑनलाईन वितरित करण्यात आले.

कंपनी, एखादा उद्याेग, कर्मचारी भरती, परदेशवारी आणि न्यायालयीन व निवडणुकीसाठी चारित्र्य प्रमाणपत्राची आवश्यकता असते. एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यापूर्वी पोलिसांमार्फत संबंधित कर्मचारी अथवा कामगारांची चारित्र्य पडताळणी करण्यात येते. मात्र यावर्षात कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने त्याचा परिणाम यावर झाला.  परिणामी अनेक व्यवसाय ठप्प पडले, कामगारांना देखील कमी करण्यात आले. त्यामुळे चारित्र्य प्रमाणपत्र देण्याची संख्याही घटली. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील एमआयडीसी भागातील विविध उद्योग पूर्वपदावर आले असून, परप्रांतीय कामगार दाखल होत आहेत. त्यामुळे चारित्र्यप्रमाणपत्रांची संख्या वाढू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ४९९ प्रमाणपत्र काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रमाणपत्र काढणाऱ्यांची संख्या तुलनेने वाढली आहे. 

दोन वर्षांत ७५०० कामगारांची पडताळणीजिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने दाखल झालेल्या अर्जानुसार १ जानेवारी २०१८ ते १ जानेवारी २०१९ या काळात एकूण ७ हजार ४७० जणांची चारित्र्य पडताळणी करण्यात आली. या नागरिकांना पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्या तुलनेत यावर्षी प्रमाणपत्रांची संख्या घटली आहे. 

पडताळणीसाठी असा करा अर्जऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. अर्ज अपलोड झाल्यानंतर तो थेट संबंधित पोलीस ठाण्यात जातो. तेथे चारित्र्य पडताळणी झाल्यानंतर हा अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे येतो. या ठिकाणी जिल्ह्यातील डाटा तपासला जातो.

चारित्र्यप्रमाणपत्रासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तींवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि सीसीटीएनएसच्या सहाय्याने जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, याची तपासणी केली जाते. त्यानंतर प्रमाणपत्र वितरित होते.- संदीपान शेळके, पोलीस निरीक्षक

अनलॉकच्या प्रक्रियेनंतर कामगार जिल्ह्यात परतण्यास सुरुवात झाली आहे. काही स्थानिक कामगारांनीही पुन्हा त्यांचे काम सुरू केले आहे. अशा वेळी त्या सर्व कामगारांची चारित्र्य पडताळणी करून त्यांना कामगावर रुजू करून घेतले आहे.  - आनंद भगत, उद्योजक

टॅग्स :Policeपोलिसparabhaniपरभणी