शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

परभणी जिल्ह्यात केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:59 IST

जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला असून, जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीप्रश्न गंभीर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला असून, जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीप्रश्न गंभीर होत आहे.मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. जिंतूर तालुक्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे या प्रकल्पात पाणीसाठाच झाला नाही. परभणीसह जिंतूर, पूर्णा, हिंगोली शहराला येलदरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या मात्र प्रकल्प मृतसाठ्यात गेला आहे. त्यामुळे परभणी, पूर्णा या शहरांसाठी सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून पाणी घ्यावे लागत आहे.जिल्ह्यातील चौदा प्रकल्पांमध्ये एकूण ७० दलघमी पाणीसाठा असून, या साठ्यातून किती गावांना पाणी पुरेल, असा प्रश्न निर्माण होत आहे. येलदरी, मासोळी मध्यम प्रकल्प आणि मुळीचा बंधारा पूर्णत: कोरडा पडला आहे. करपरा मध्यम प्रकल्पात १२ टक्के, डिग्रस, मुद्गल व ढालेगाव बंधाऱ्यात प्रत्येकी १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सेलू येथील निम्न दुधना प्रकल्पातच सर्वाधिक १९.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४५.९४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा या प्रकल्पात असून, परभणी, पूर्णा, सेलू, मानवत या चार शहरांसह तालुक्यातील अनेक गावांची पाण्याची भिस्त याच प्रकल्पावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वी निम्न दुधनातून नांदेड शहरासाठीही पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. या प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता, हा पाणीसाठा जिल्ह्यासाठीच वापरावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईRainपाऊस