शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहाशे गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST

परभणी : शहराबरोबरच आता ग्रामीण भागातील कोरोनाचा विळखा कमी झाला आहे. त्यामुळे ६५७ गावांमधील कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, ...

परभणी : शहराबरोबरच आता ग्रामीण भागातील कोरोनाचा विळखा कमी झाला आहे. त्यामुळे ६५७ गावांमधील कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, या गावांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. सद्यस्थितीला केवळ ६२ गावांमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही भरडला गेला होता. जिल्ह्यात एकूण ८०४ गावे असून त्यापैकी सुमारे ७१९ गावांमध्ये बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मे महिन्यात शहरी भागातील रुग्णसंख्येच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे जिल्ह्यातच चिंतेचे वातावरण होते. मात्र जून महिन्यापासून कोरोना संसर्ग कमी झाला आहे. नवीन बाधित रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या घटली असून, नागरिकांना दिलासा मिळत आहे.

शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागातही बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सद्यस्थितीला ग्रामीण भागात केवळ ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ७१९ गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी सध्या ६५ गावांमध्येच बाधित रुग्ण उपचार घेत असून, उर्वरित गावे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही व्यवहार आता पूर्वपदावर आले आहेत. सध्या ६२ गावांमध्ये बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यात जिंतूर तालुक्यात सर्वाधिक १७ गावांमध्ये रुग्ण आहेत. त्याखालोखाल गंगाखेड तालुक्यातील १२, सेलू तालुक्यातील तीन गावांमध्ये रुग्ण नोंद झाले आहेत. परभणी आणि पाथरी तालुक्यांमध्ये प्रत्येकी पाच गावांतून कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. एकंदर ग्रामीण भागातील कोरोनाबाधित गावांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने हा संसर्ग कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

३१ गावांमध्ये शंभरपेक्षा अधिक रुग्णांची नोंद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये कोरोना पोहोचला होता. विशेष म्हणजे, काही गावांमध्ये शंभरपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात अशी ३१ गावे आहेत. परभणी तालुक्यात सर्वाधिक १३, पूर्णा ३, गंगाखेड २, मानवत ३ आणि सेलू तालुक्यातील एका गावात १०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे ५१ ते १०० रुग्णांची नोंद झालेली ७१ गावे असून २५ पेक्षा अधिक रुग्णसंख्या नोंद झालेल्या १४९ गावांचा समावेश आहे.

११० गावांमध्ये पोहोचला नाही कोरोना

जिल्ह्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही कोरोनाबाधित होत असतानाच, ११० गावे मात्र कोरोनापासून दूर राहिली आहेत. विशेष म्हणजे, गंगाखेड तालुक्यातील सर्वाधिक २९ गावांमध्ये अद्यापही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, तर जिंतूर आणि पालम तालुक्यातील प्रत्येकी २१ गावांमध्ये कोरोनाचा रुग्ण नोंद झाला नाही. त्यामुळे या गावांचा आदर्श इतर गावांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.