शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

साडेसहाशे गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST

परभणी : शहराबरोबरच आता ग्रामीण भागातील कोरोनाचा विळखा कमी झाला आहे. त्यामुळे ६५७ गावांमधील कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, ...

परभणी : शहराबरोबरच आता ग्रामीण भागातील कोरोनाचा विळखा कमी झाला आहे. त्यामुळे ६५७ गावांमधील कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, या गावांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. सद्यस्थितीला केवळ ६२ गावांमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही भरडला गेला होता. जिल्ह्यात एकूण ८०४ गावे असून त्यापैकी सुमारे ७१९ गावांमध्ये बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मे महिन्यात शहरी भागातील रुग्णसंख्येच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे जिल्ह्यातच चिंतेचे वातावरण होते. मात्र जून महिन्यापासून कोरोना संसर्ग कमी झाला आहे. नवीन बाधित रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या घटली असून, नागरिकांना दिलासा मिळत आहे.

शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागातही बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सद्यस्थितीला ग्रामीण भागात केवळ ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ७१९ गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी सध्या ६५ गावांमध्येच बाधित रुग्ण उपचार घेत असून, उर्वरित गावे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही व्यवहार आता पूर्वपदावर आले आहेत. सध्या ६२ गावांमध्ये बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यात जिंतूर तालुक्यात सर्वाधिक १७ गावांमध्ये रुग्ण आहेत. त्याखालोखाल गंगाखेड तालुक्यातील १२, सेलू तालुक्यातील तीन गावांमध्ये रुग्ण नोंद झाले आहेत. परभणी आणि पाथरी तालुक्यांमध्ये प्रत्येकी पाच गावांतून कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. एकंदर ग्रामीण भागातील कोरोनाबाधित गावांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने हा संसर्ग कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

३१ गावांमध्ये शंभरपेक्षा अधिक रुग्णांची नोंद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये कोरोना पोहोचला होता. विशेष म्हणजे, काही गावांमध्ये शंभरपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात अशी ३१ गावे आहेत. परभणी तालुक्यात सर्वाधिक १३, पूर्णा ३, गंगाखेड २, मानवत ३ आणि सेलू तालुक्यातील एका गावात १०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे ५१ ते १०० रुग्णांची नोंद झालेली ७१ गावे असून २५ पेक्षा अधिक रुग्णसंख्या नोंद झालेल्या १४९ गावांचा समावेश आहे.

११० गावांमध्ये पोहोचला नाही कोरोना

जिल्ह्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही कोरोनाबाधित होत असतानाच, ११० गावे मात्र कोरोनापासून दूर राहिली आहेत. विशेष म्हणजे, गंगाखेड तालुक्यातील सर्वाधिक २९ गावांमध्ये अद्यापही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, तर जिंतूर आणि पालम तालुक्यातील प्रत्येकी २१ गावांमध्ये कोरोनाचा रुग्ण नोंद झाला नाही. त्यामुळे या गावांचा आदर्श इतर गावांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.