शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

संचारबंदी नव्हे फक्त दुकान बंदीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठ दिवसांत सरासरी सव्वा तीनशे रुग्ण आढळून येत आहेत. कोरेानाचा हा ...

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठ दिवसांत सरासरी सव्वा तीनशे रुग्ण आढळून येत आहेत. कोरेानाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात २४ मार्च रोजी सायंकाळी ७ ते १ एप्रिल सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. शिवाय अन्यही काही बाबींच्या अनुषंगाने सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रस्त्यावर संचारबंदी कालावधीत बाजारात, गल्लीत किंवा घराबाहेर फिरताना आढळून आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता; परंतु हा इशारा फक्त कागदावरच असल्याचा अनुभव जिल्हावासीयांना गेल्या दोन दिवसांपासून अनुभवयास येत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ सुरू आहे. जिल्ह्यात खासगी व प्रवासी सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी असतानाही सर्रास वाहनांची ये-जा सुरू असल्याचे दिसून आले. शहरातील डॉक्टरलेन, जिंतूर रोड, वसमत रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते ग्रँड कॉर्नर, धार रोड, वांगी रोड, पाथरी रोड, गंगाखेड रोड आदी भागांत वाहनधारक निसंकोच रस्त्यावर फिरताना आढळून आले. अनेक नागरिकही दुचाकीवर तसेच रस्त्याने चालतानाही दिसून आले. विशेष म्हणजे नागरिक रस्त्यावर असताना संचारबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करणारी पोलीस यंत्रणा मात्र गायब असल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीऐवजी दुकान बंदी आदेश लागू केला आहे की काय? असा सवाल व्यापाऱ्यांमधून उपस्थित केला जात होता.

तालुक्याच्या ठिकाणीही अशीच स्थिती

परभणी शहराबरोबरच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या ठिकाणीही अशीच स्थिती पहावयास मिळाली. सेलू येथे संचारबंदीचे उल्लंघन करून नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून आले. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने रस्त्यावर दिसून आली. पालम शहरातील मुख्य चौकात तसेच नवा मोंढा, बसस्थानक तसहील कार्यालय परिसर, फरकंडा रस्ता आदी भागातही नागरिकांची वर्दळ होती. पोलीस मात्र गायब होते. पाथरी शहरात सकाळी व सायंकाळी रस्त्यावर नागरिक होते. दुपारी मात्र तुरळक प्रमाणात नागरिक दिसून आले. जिंतूर शहरातही संचारबंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. सकाळपासूनच शहरातील रस्त्यावर नागरिक पहावयास मिळाले. याशिवाय फळ विक्रेत्यांनीही आपली दुकाने थाटली होती. काही भागात हॉटेलचालकांनी समोरून शटर बंद ठेवून आत मात्र नागरिकांच्या चहापानाची व्यवस्था केली होती. महसूल किंवा पोलीस विभागाचे अधिकारी मात्र गायब होते.