शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

सरपंच पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST

जिंतूर : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीत काठावरचे बहुमत मिळाल्याने अनेक ठिकाणी सरपंच पदासाठी नवनिर्वाचित उमेदवारांची पळवा पळवी करण्याचे प्रयत्न सुरू ...

जिंतूर : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीत काठावरचे बहुमत मिळाल्याने अनेक ठिकाणी सरपंच पदासाठी नवनिर्वाचित उमेदवारांची पळवा पळवी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने अनेक पॅनल प्रमुख निवडून आलेल्या उमेदवारांना सुरक्षित स्थळी हलवले जात असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात पहावयास मिळत आहे.

जिंतूर तालुक्यामध्ये १०१ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका संपन्न झाल्या. अनेक ठिकाणी अटीतटीच्या निवडणुका झाल्याने स्पष्ट बहुमत कोणत्या पॅनलला मिळाले नाही. साधारण ७ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीत ४-३, ९ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीत ५-४, ११ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीत ६-५, १३ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीत ७-६ असे सदस्य निवडून आले आहे. सत्ताधारी पक्षातील एक सदस्य फुटला तर ग्रामपंचायत आपल्या हातून जाऊ शकते. यासाठी अनेक ठिकाणी सदस्यांच्या पळवापळवीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत पातळीवर ५ लाखापासून १० लाखापर्यंत सदस्यांना आमिष दाखविण्यात येत आहेत. शिवाय उपसरपंच हे मानाचे पद देण्यात येईल असेही आमिष दिल्या जात आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडून येऊनही शेवटपर्यंत निवडून आलेल्या सदस्यांसोबत राहतील की नाही याबाबत शाश्वती नसल्याने प्रमुख हैराण झाले आहे. एकीकडे निवडणुकीमध्ये लाखो रुपये खर्च केलेला असताना व पॅनलमध्ये सदस्य निवडून येऊनही सत्ता येईल की नाही याबाबत शाश्वती नसल्याने पॅनलप्रमुख बेजार झाले आहे. त्यातच नवनिर्वाचित सदस्यांना आपल्याकडेच ठेवण्यासाठी अनेक पॅनलप्रमुखांनी निवडून आलेले सर्व सदस्य सहलीला पाठवले आहेत. अनेकांनी अज्ञात ठिकाणी सदस्य ठेवले आहेत. परिणामी निवडून येऊनही सत्ता येईल की नाही याची शाश्वती आता पॅनल प्रमुखांना राहिली नाही.

सरपंच निवडीच्या तारखेकडे लक्ष

एकीकडे लाखो रुपये खर्चून ग्रामपंचायत निवडणूक लढविली आता पॅनल प्रमुखांचे लक्ष सरपंच पदाच्या निवडीच्या तारखेकडे लागले आहे. यासंदर्भात प्रशासनाने अद्यापही तारखा जाहीर केल्या नसल्या तरी लवकरात लवकर तारखा जाहीर होतील. या आशेने अनेक सदस्य बाहेरगावी ठेवले असून अज्ञात स्थळी असणाऱ्या सदस्यांना पूर्ण रसद पुरवण्याची जबाबदारी गावातील पॅनल प्रमुख तसेच ज्यांना सरपंच व्हायचे आहे अशांनी बाळगली असल्याचे चित्र दिसत आहे.