शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST

कोरोनाच्या पहिला लाटेत नोव्हेंबर महिन्यापर्यंत संचारबंदी होती. दोन ते तीन महिन्याच्या सवलतीनंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यापासून संचारबंदी आणि कोरोनाचे संकट ...

कोरोनाच्या पहिला लाटेत नोव्हेंबर महिन्यापर्यंत संचारबंदी होती. दोन ते तीन महिन्याच्या सवलतीनंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यापासून संचारबंदी आणि कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे मागच्या दोन वर्षांपासून लेकींना त्यांच्या माहेरी जाता आले नाही. वाहतूक सेवा ठप्प असणे, कोरोनाचा संसर्ग वाढणे यासारख्या कारणांमुळे लेकींचा माहेरचा प्रवास ठप्प झाला आहे. अशीच अवस्था लहान मुलांचीही झाली असून, मुलांना मामाचे गाव दूर झाले आहे. त्यामुळे कधी एकदा कोरोनाचे संकट संपते आणि माहेरी जाते, अशी अवस्था विवाहितांची झाली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या मातांनाही आपल्या मुलींच्या भेटीची ओढ लागली आहे.

गेल्या वर्षीपासून मुलीची भेट नाही. आता उन्हाळ्यात मुलीला नातवांसह रसाळीकरिता माहेरी बोलावले होते; परंतु कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढल्यामुळे सासरची मंडळी मुलीला पाठवत नाहीत. त्यातच संचारबंदीत बससेवा बंद असल्यामुळे मलाही मुलीकडे भेटण्यासाठी जाता येत नाही. उन्हाळ्यात मुलींना बघून बोलण्याच्या सुखद क्षणावर कोरोनाने विरजण टाकले. पण आम्ही मोबाईलवर संवाद साधतो.

शिवकांता जनार्दन केदारी,

चारठाणा, ता. जिंतूर.

यावर्षीच मुलीचे लग्न झाले. तिला प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे. पण कोरोनामुळे तिला माहेरी येता येत नाही. असे असले तरी या परिस्थितीत आम्ही मोबाईलवर, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधत समाधान मानत आहोत.

शारदा बबन भोगावकर,

देऊळगाव गात, ता. सेलू.

मुलीला सण किंवा कार्यक्रमासाठी माहेरी बोलावले होते; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सासरच्या मंडळीची इच्छा असूनही त्यांनी मुलीला पाठवले नाही. कोरोनाने अशी वाईट परिस्थिती आणली. कोरोना लवकर संपावा.

यमुना भारत धरफडे,

माहेरच्या मंडळीला भेटण्याची गेल्या दीड वर्षापासून आस लागली आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने माहेरी जाणे शक्य होत नाही. कोरोनाची भीती वाटत असल्याने शेवटी मोबाईलवरून संवाद साधत माहेरकडील समाचार जाणून घेत आहे.

आशामती विष्णू काटकर,

वरुड नृसिंह, ता. जिंतूर.

संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. माहेरच्या मंडळीने रसाळी जेवणाचे निमंत्रण दिले. मुलांसह माहेरी जाण्याचा बेत होता. पण कोरोनाची भीती आणि बससेवा बंद असल्याने माहेरी जाता येत नाही.

संतोषी संजय वाशिंबे,

समतानगर, सेलू

आपल्या कुटुंबाची व उतारवयातील सासू, सासरे यांची काळजी म्हणून माहेराला जाणे टाळले आहे; परंतु कोरोनामुळे आपली मायेची माणसे दुरावली जात आहेत. किमान उन्हाळ्याचे चार दिवस एकत्र घालवण्याचा आनंद हिरावला गेला आहे.

अरुणा भुजंग थोरे,

गणेशनगर,सेलू.

दरवर्षी उन्हाळी सुटीत मामाच्या गावाला जात होतो. पण सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे जाता आले नाही. मामाच्या गावची मज्जा वेगळीच असते. पण हा आनंद कोरोनाने हिसकावून घेतला.

हर्षद नागनाथ साळेगावकर,

देवगावफाटा, ता.सेलू.

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. घराबाहेर पडणेही बंद आहे. त्यामुळे मामाच्या गावाला जाता येत नाही. कोरोना संपताच मामाच्या गावाला जाणार आहे. मागील दीड वर्षापासून मामाची भेट दुर्मिळ झाली आहे.

ओम मल्लिकार्जुन भोगावकर,

सह्याद्री नगर, सेलू.

मामाच्या गावी जाऊन मजा करणे यासारखा आनंद दुसरा कशात नाही. पण या आनंदावर कोरोनाने पाणी फेरले आहे. मामाची मुले व मित्र कंपनी वाट पाहत आहेत. कोरोना कधी संपतो, याची मी वाट पाहत आहे.

प्रज्वल प्रकाश थोरात,

पारीख कॉलनी, सेलू.

वालूर, ता. सेलू