शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

महावितरण कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले; वीज खंडित केल्याने ग्रामस्थांचा रोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 17:55 IST

तब्बल अडीच तास कर्मचाऱ्यांना ग्राम पंचायत कार्यालयात थांबुन ठेवले

पाथरी (परभणी) : थकीत वीज वसुलीसाठी आलेल्या  वीज वितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केल्यानंतर  ग्रामस्थांच्या  रोषाला सामोरे जावे लागले आहे. पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित केल्याचा आरोप करत तसेच गावातील विजेचे पोल दुरुस्ती करून द्या नंतरच वसुली मागा अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांना अक्षरशः कोंडून ठेवले. पोलिसांच्या मध्यस्थीती नंतर विज पुरवठा सुरू करण्यात आल्या नंतर कर्मचाऱ्यांची सुटका झाली हा प्रकार तालुक्यातील वडी येथे 27 मे रोजी दुपारी घडला

तालुक्यातील वडी येथे वीज वितरणचे अभियंता डिग्रसकर, कर्मचारी वाघ, पठाण यांचे पथक सकाळी 11 वाजेच्या सुमारास गावात दाखल झाले. थकीत वीजबिल वसुलीसाठी पथकाने गावातील पुरवठा खंडित केले. कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता गावचा वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने जवळपास २०० ग्रामस्थांच्या जमावाने पथकाला घेराव घातला. गावकरी नियमित बिल भरतात महावितरण गावातील 1965 सालच्या पोलची दुरुस्ती करा, गावात सिंगल फेज डीपी नसल्याने 12 तास वीज पुरवठा बंद असतो, तो सुरळीत करा त्यानंतरच थकबाकी वसुलीचे बोला, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.  

दरम्यान, ग्रामस्थ आणि महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. दुरुस्ती झाल्याशिवाय वीज पुरवठा खंडित करता येणार नाही, वीज पुरवठा जोडून दिल्या शिवाय गावातून बाहेर पडू दिले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेत सर्व कर्मचाऱ्यांना ग्राम पंचायत कार्यालयात थांबवून ठेवले. ग्रामस्थांचा रोषाचा सामना करावा लागल्याने कर्मचाऱ्यांना नाईलाज झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले. गावचा वीज पुरवठा जोडून देऊन पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना गावाबाहेर जाण्यास ग्रामस्थांनी परवानगी दिल्याची माहिती सिद्धेश्वर शिंदे आणि नितीन कुटे यांनी दिली.

टॅग्स :electricityवीजparabhaniपरभणीmahavitaranमहावितरण