शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

परभणी जिल्ह्यात बाजारपेठा बंद; वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST

परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून, गुरुवारी पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने ...

परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून, गुरुवारी पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने सुमारे ५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प पडली आहे. विशेष म्हणजे, बाजारपेठा बंद असल्या तरी रस्त्यांवर मात्र नागरिकांची वर्दळ दिवसभर सुरू होती.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्च रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी सकाळपासून बाजारपेठ बंद राहिली. येथील गुजरी बाजार, शिवाजी चौक, कच्छी बाजार, गांधी पार्क, नानलपेठ परिसर, सराफा बाजार या भागात दिवसभर शुकशुकाट निर्माण झाला होता. संचारबंदीला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असला तरी प्रत्यक्षात गुरुवारी बाजारपेठेतील एकही दुकान सुरू नव्हते.

संचारबंदीमुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प राहिली. जिल्ह्यात छोटे-मोठ्या व्यावसायिकांकडून साधारणत: दररोज ५० कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यातून मजुरांना रोजगारही मिळतो. मात्र, बाजारपेठ बंद राहिल्याने ही उलाढाल ठप्प राहिली आहे.

संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. मात्र, असे असताना अनेक नागरिक विनाकारण रस्त्यांवरून फिरत असल्याचे दिसून आले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर वर्दळ सुरू होती. हे वाहनधारक अत्यावश्यक सेवेतील आहेत का? ते का? फिरतात याबाबत प्रशासनाकडून विचारणा झाली नाही. त्यामुळे दुपारनंतर रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली. गुरुवारी पहिल्याच दिवशी बाजारपेठा कडकडीत बंद आणि रस्त्यांवरील वर्दळ सुरू, अशी स्थिती होती.

संचारबंदीमुळे गर्दीवर नियंत्रण

संचारबंदी लागू केल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळाले असून, विविध हॉटेल्स, चहा स्टॉल्स आणि पान टपऱ्यांवर विनाकारण होणारी गर्दी बंद झाली आहे. तसेच बाजारपेठेतही सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास होणारी गर्दी गुरुवारी दिसली नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळाल्याचे दिसून आले.