शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

बाजारपेठ बंद; रस्त्यांवर तुरळक वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी जिल्हा प्रशासनाने अजूनही वीकेंड संचारबंदी सुरूच ठेवलेली आहे. शुक्रवारी यासंदर्भातील आदेश काढून जीवनावश्यक ...

कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी जिल्हा प्रशासनाने अजूनही वीकेंड संचारबंदी सुरूच ठेवलेली आहे. शुक्रवारी यासंदर्भातील आदेश काढून जीवनावश्यक सेवा असलेल्या किराणा आणि फळे, भाजीपाला विक्रीची दुकाने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बंद ठेवण्याचे निर्देश दिले. शनिवारी बाजारपेठ भागात काही प्रमाणात वर्दळ दिसून आली होती. मात्र, रविवारी बाजारपेठ भागातील बहुतांश दुकाने बंद होती. काही भागांत व्यापारी बंद दुकानासमोर थांबून ग्राहकांची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून आले. मात्र, रस्त्यावरच तुरळक वर्दळ असल्याने फारसा परिणाम झाला नाही. शिवाजी चौक, गुजरी बाजार, कच्छी मार्केट, नानलपेठ या परिसरात दुपारनंतर शुकशुकाट पाहावयास मिळाला. बाजारपेठ भागातील शिवाजी चौक, अष्टभुजा देवी मंदिर, वसमत रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर या भागात पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर काही प्रमाणात फरक जाणवला.

रविवारी शहरातील बाजारपेठ भागातील रस्त्यांसह, बसस्थानक ते उड्डाणपूल, गंगाखेड रोड, जिंतूर रोड, वसमत रोड या मार्गावरील वाहतूक कमी झाली होती. तुरळक वाहने रस्त्याने धावताना दिसून आली. दुपारनंतर ही संख्याही कमी झाली. त्यामुळे संचारबंदीच्या शेवटच्या दिवशी शहरातील वातावरण सामसूम झाल्याचे पाहावयास मिळाले.

तपासणी केंद्राला नागरिकांची प्रतीक्षा

रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची शिवाजी चौक भागात रॅपिड अँटिजन तपासणी करण्यासाठी मनपाने केंद्र सुरू केले आहे. या तपासण्या करण्यासाठी सकाळपासूनच हे केंद्र सज्ज ठेवण्यात आले. मात्र, रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांची संख्याच कमी झाल्याने या केंद्रावरही शुकशुकाट पाहावयास मिळाला. रॅपिड तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या किट घेऊन दोन महिला कर्मचारी या ठिकाणी दिवसभर थांबून होत्या.