शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी समाजकल्याण विभागाकडून महावितरणकडे ४२ लाखांचा निधी वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 17:31 IST

समाजकल्याण विभागाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ४२ लाख रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केला आहे.

परभणी : समाजकल्याण विभागाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ४२ लाख रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केला आहे. 

जिल्ह्यामध्ये महावितरणचे २ लाख वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांना महावितरणच्या परभणी शहर, पाथरी, पूर्णा, गंगाखेड, सेलू, जिंतूर, सोनपेठ, मानवत, पालम व परभणी ग्रामीण या १० उपविभागांतर्गत वीज पुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून  वीज ग्राहकांकडे महावितरणचा थकबाकीचा डोंगर वाढला आहे. सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यातील ९३ हजार ३६५ वीज ग्राहकांकडे ७७४ कोटी ८५ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये परभणी शहर उपविभागांतर्गत दीडशे ग्राहकांकडे १७४ कोटी ९५ लाख, परभणी ग्रामीण उपविभागांतर्गत ५ हजार ५१५ ग्राहकांकडे ४२ कोटी २४ लाख ४६ हजार, पाथरी ३ हजार २०६ ग्राहकांकडे २३ कोटी ४० लाख २७ हजार, पूर्णा २ हजार ६०९ ग्राहकांकडे १९ कोटी ५ लाख ९९ हजार, गंगाखेड २ हजार ४७८ ग्राहकांकडे १७ कोटी २० लाख २६ हजार, सेलू ३ हजार ५४९ ग्राहकांकडे २४ कोटी ४२ लाख ५५ हजार, जिंतूर ५ हजार ५१३ ग्राहकांकडे ५१ कोटी ५२ लाख ६८ हजार, सोनपेठ १ हजार २०५ ग्राहकांकडे १० कोटी ३३ लाख ६ हजार, पालम २ हजार ४४७ ग्राहकांकडे ११ कोटी ९३ लाख ५३ हजार, मानवत २ हजार ५०६ ग्राहकांकडे १७ कोटी ६२ लाख ४८ हजार अशी थकबाकी आहे.

त्यामुळे जिल्ह्यामध्ये विजेच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरण कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ स्तरावरुन थकबाकी अभावी दुरुस्तीचे सामान मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यामध्ये वीज पुरवठा सुरळीत करताना महावितरणला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, समाजकल्याण विभागाने अनुसूचित जाती व जमातीतील वीज ग्राहकांना घरगुती वीज जोडणी व कृषी पंपाची वीज जोडणी देण्यासाठी ४२ लाख रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केला आहे. त्यामुळे काही प्रमाणात विजेच्या समस्या मार्गी लागणार आहेत. 

नियोजनच्या निधीकडे लक्षजिल्ह्यामध्ये भेडसावणार्‍या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून महावितरणला जवळपास १ कोटी रुपयांचा निधी देण्यात  येणार आहे. या निधीतून वीज ग्राहकांच्या समस्या दूर करण्यात येणार आहेत. परंतु, अद्यापपर्यंतही जिल्हा नियोजनमधून महावितरणला निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे विजेच्या समस्या जैसे थे आहेत. याबाबत महावितरणने जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा, यासाठी पत्र व्यवहार केला आहे. हा निधी मिळताच विजेच्या समस्या सोडविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणparabhaniपरभणी