शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वचननाम्यात प्रिंटींग मिस्टेक नाही;प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 16:42 IST

या निवडणुकीत समोर कोणीच दिसत नाही़ काँग्रेस म्हणून जो काही प्रकार देशात होता तो आता दिसत नाही़

परभणी- शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यातील प्रत्येक बाबीची पडताळणी करण्यात आली आहे़ काना, उकार, मात्रा सगळे तपासून, पडताळून  जबाबदारीने हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात कुठलीही प्रिंटींग मिस्टेक नाही, त्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार आहे,  असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केले़

परभणी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर खा़ संजय जाधव, शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरुरकर, उमेदवार डॉ़ राहुल पाटील, माजी आ़ विजय गव्हाणे, भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, रिपाइंचे डॉ़ सिद्धार्थ भालेराव, डी़एऩ दाभाडे, शिवसंग्रामचे सुभाष जावळे आदींची उपस्थिती होती़

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या निवडणुकीत समोर कोणीच दिसत नाही़ काँग्रेस म्हणून जो काही प्रकार देशात होता तो आता दिसत नाही़ त्यामुळे काँग्रेस विषयी काय व कोणावर बोलावे? हेच समजत नाही़ काँग्रेसचा बुड आणि शेंडा काहीही उरला नाही, असेही ते म्हणाले़ शरद पवार यांच्याविषयी आपणाला आदर आहे़ ते फिरत आहेत; परंतु, ते किती बोलतात, आता हे सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे ते सांगतात़ मग, २०१४ साल आठवा़ निकालाचा दिवस आठवा़ त्यादिवशी संपूर्ण निकाल लागण्याअगोदरच भाजपाला बिनशर्त पाठिंबा कोणी जाहीर केला होता? शरद पवार यांचे प्रफुल्ल पटेल यांनी तसे जाहीर केले होते़ त्यावेळी तुम्ही लोटांगण घातले होते़ मग, आम्ही उघड उघड केलं़ कारण आम्ही एका विचाराचे माणसं आहोत़ तुमच्याकडे आचार ना विचार जिकडे सत्ता तिकडे तुम्ही आणि आज आम्ही एकत्र आल्यावर सांगता की हे सरकार घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही़ माणसं स्वस्थ बसू नये, हे खरं आहे़; परंतु, तुम्ही कितीही आदळआपट केली तरी हे सरकार जाणार नाही़ आयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे ही आमची मागणी कायम आहे, ती सोडणार नाही; परंतु, न्यायालयाचा निकाल येतोय, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे़ त्यामुळे आम्ही थांबलो आहोत़ राम मंदिरासाठी उठलेल्या हातांना आम्ही वाºयावर सोडणार नाही, त्यांच्या हातांना काम देण्याची आमची जबाबदारी आहे़ यासाठी शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात कसल्याही प्रकारची प्रिंटींग मिस्टेक नाही़ अत्यंत जबाबदारीने पूर्ण पडताळून काना, उकार, मात्रा सर्व बाबींची तपासणी करून हा वचननामा प्रसिद्ध केला आहे़ त्यातील प्रत्येक आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत़ विरोधक निवडणुका आल्या म्हणून आश्वासने दिली असल्याचे म्हणत आहेत; परंतु, आम्ही बोलत नाही तर करून दाखवितो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parbhani-acपरभणीUddhav Thackerayउद्धव ठाकरे