शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

वचननाम्यात प्रिंटींग मिस्टेक नाही;प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 16:42 IST

या निवडणुकीत समोर कोणीच दिसत नाही़ काँग्रेस म्हणून जो काही प्रकार देशात होता तो आता दिसत नाही़

परभणी- शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यातील प्रत्येक बाबीची पडताळणी करण्यात आली आहे़ काना, उकार, मात्रा सगळे तपासून, पडताळून  जबाबदारीने हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात कुठलीही प्रिंटींग मिस्टेक नाही, त्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार आहे,  असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केले़

परभणी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर खा़ संजय जाधव, शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरुरकर, उमेदवार डॉ़ राहुल पाटील, माजी आ़ विजय गव्हाणे, भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, रिपाइंचे डॉ़ सिद्धार्थ भालेराव, डी़एऩ दाभाडे, शिवसंग्रामचे सुभाष जावळे आदींची उपस्थिती होती़

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या निवडणुकीत समोर कोणीच दिसत नाही़ काँग्रेस म्हणून जो काही प्रकार देशात होता तो आता दिसत नाही़ त्यामुळे काँग्रेस विषयी काय व कोणावर बोलावे? हेच समजत नाही़ काँग्रेसचा बुड आणि शेंडा काहीही उरला नाही, असेही ते म्हणाले़ शरद पवार यांच्याविषयी आपणाला आदर आहे़ ते फिरत आहेत; परंतु, ते किती बोलतात, आता हे सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे ते सांगतात़ मग, २०१४ साल आठवा़ निकालाचा दिवस आठवा़ त्यादिवशी संपूर्ण निकाल लागण्याअगोदरच भाजपाला बिनशर्त पाठिंबा कोणी जाहीर केला होता? शरद पवार यांचे प्रफुल्ल पटेल यांनी तसे जाहीर केले होते़ त्यावेळी तुम्ही लोटांगण घातले होते़ मग, आम्ही उघड उघड केलं़ कारण आम्ही एका विचाराचे माणसं आहोत़ तुमच्याकडे आचार ना विचार जिकडे सत्ता तिकडे तुम्ही आणि आज आम्ही एकत्र आल्यावर सांगता की हे सरकार घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही़ माणसं स्वस्थ बसू नये, हे खरं आहे़; परंतु, तुम्ही कितीही आदळआपट केली तरी हे सरकार जाणार नाही़ आयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे ही आमची मागणी कायम आहे, ती सोडणार नाही; परंतु, न्यायालयाचा निकाल येतोय, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे़ त्यामुळे आम्ही थांबलो आहोत़ राम मंदिरासाठी उठलेल्या हातांना आम्ही वाºयावर सोडणार नाही, त्यांच्या हातांना काम देण्याची आमची जबाबदारी आहे़ यासाठी शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात कसल्याही प्रकारची प्रिंटींग मिस्टेक नाही़ अत्यंत जबाबदारीने पूर्ण पडताळून काना, उकार, मात्रा सर्व बाबींची तपासणी करून हा वचननामा प्रसिद्ध केला आहे़ त्यातील प्रत्येक आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत़ विरोधक निवडणुका आल्या म्हणून आश्वासने दिली असल्याचे म्हणत आहेत; परंतु, आम्ही बोलत नाही तर करून दाखवितो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parbhani-acपरभणीUddhav Thackerayउद्धव ठाकरे