शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

पंचनाम्यासाठी प्रश्नांचा भडीमार; रागाच्या भरात शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 20:17 IST

पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाने अनेक प्रश्न विचारल्याने राग अनावर

बामणी : काढणीला आलेले सोयाबीन शेतात गंजी करुन ठेवल्यानंतर अतिवृष्टीने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या पथकाने अनेक कागदपत्रांची मागणी केली. शिवाय प्रश्नांचा भडीमार केल्याने संतप्त झालेल्या चौधरणी येथील एका शेतकऱ्याने सोयाबीनची गंजीच पेटवून दिल्याचा प्रकार बुधवारी घडला. 

बामणी येथून काही अंतरावर असलेल्या चौधरणी येथील शेतकरी शेख हमीद अब्दुल रज्जाक यांना ७ एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी संपूर्ण शेतात सोयाबीनचा पेरा केला होता. या भागात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनचे पीकही चांगले आले होते. शेतातील सोयाबीन काढणीला आल्यानंतर त्यांनी ते कापून त्याची शेतात गंजी लावली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून या भागात अतिवृष्टी सुरु झाली. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे या भागात चिखल झाल्याने वाहन घेऊन जाता येईना. आशात पाऊसही थांबत नसल्याने शेख हमीद हे हतबल झाले. याच दरम्यान, अतिवृष्टीमुळे गंजीतील सोयाबीन काळे पडले. त्याचा उग्रवास येऊ लागला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्यांना या पिकाची परिस्थिती पाहून काय करावे, हे कळेना.

बुधवारी दुपारी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा केला. पंचनाम्याच्या वेळी त्यांना या पथकातील कर्मचाऱ्यांकडून विविध कागदपत्रांची मागणी केली गेली. शिवाय अनेक अनावश्यक प्रश्न विचारल्याने ते अस्वस्थ झाले. पंचनामा करुन पथक निघून गेले. त्यानंतरही शेतकरी शेख हमीद हे शेतामध्येच थांबून होते. पोटच्या पोराप्रमाणे पिकाला वाढवून मोठं केलं. उत्पादन निघेल, असे वाटत असताना अतिवृष्टी झाली आणि सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं. सरकारकडून मदत मिळेल, असं वाटलं; परंतु, पंचनाम्यासाठी आलेले कर्मचारी अनेक कागदपत्रांची मागणी करु लागले. त्यामुळे मदत मिळेल की नाही, याबाबत त्यांना शंका वाटू लागली. याच अस्वस्थेतून त्यांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रागाच्या भरात शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली. जवळपास ३५ ते ४० पोते सोयाबीन होईल, असा अंदाज असलेली ही गंजी काही वेळातच जळून खाक झाली. 

टॅग्स :FarmerशेतकरीfireआगparabhaniपरभणीRainपाऊसRevenue Departmentमहसूल विभाग