शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

पंचनाम्यासाठी प्रश्नांचा भडीमार; रागाच्या भरात शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 20:17 IST

पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाने अनेक प्रश्न विचारल्याने राग अनावर

बामणी : काढणीला आलेले सोयाबीन शेतात गंजी करुन ठेवल्यानंतर अतिवृष्टीने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या पथकाने अनेक कागदपत्रांची मागणी केली. शिवाय प्रश्नांचा भडीमार केल्याने संतप्त झालेल्या चौधरणी येथील एका शेतकऱ्याने सोयाबीनची गंजीच पेटवून दिल्याचा प्रकार बुधवारी घडला. 

बामणी येथून काही अंतरावर असलेल्या चौधरणी येथील शेतकरी शेख हमीद अब्दुल रज्जाक यांना ७ एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी संपूर्ण शेतात सोयाबीनचा पेरा केला होता. या भागात चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनचे पीकही चांगले आले होते. शेतातील सोयाबीन काढणीला आल्यानंतर त्यांनी ते कापून त्याची शेतात गंजी लावली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून या भागात अतिवृष्टी सुरु झाली. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे या भागात चिखल झाल्याने वाहन घेऊन जाता येईना. आशात पाऊसही थांबत नसल्याने शेख हमीद हे हतबल झाले. याच दरम्यान, अतिवृष्टीमुळे गंजीतील सोयाबीन काळे पडले. त्याचा उग्रवास येऊ लागला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्यांना या पिकाची परिस्थिती पाहून काय करावे, हे कळेना.

बुधवारी दुपारी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा केला. पंचनाम्याच्या वेळी त्यांना या पथकातील कर्मचाऱ्यांकडून विविध कागदपत्रांची मागणी केली गेली. शिवाय अनेक अनावश्यक प्रश्न विचारल्याने ते अस्वस्थ झाले. पंचनामा करुन पथक निघून गेले. त्यानंतरही शेतकरी शेख हमीद हे शेतामध्येच थांबून होते. पोटच्या पोराप्रमाणे पिकाला वाढवून मोठं केलं. उत्पादन निघेल, असे वाटत असताना अतिवृष्टी झाली आणि सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं. सरकारकडून मदत मिळेल, असं वाटलं; परंतु, पंचनाम्यासाठी आलेले कर्मचारी अनेक कागदपत्रांची मागणी करु लागले. त्यामुळे मदत मिळेल की नाही, याबाबत त्यांना शंका वाटू लागली. याच अस्वस्थेतून त्यांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रागाच्या भरात शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली. जवळपास ३५ ते ४० पोते सोयाबीन होईल, असा अंदाज असलेली ही गंजी काही वेळातच जळून खाक झाली. 

टॅग्स :FarmerशेतकरीfireआगparabhaniपरभणीRainपाऊसRevenue Departmentमहसूल विभाग