शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

३४ हजार वीज ग्राहकांचा भार ९ उपकेंद्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST

देवगावफाटा : सेलू तालुक्यातील ३४ हजार वीज ग्राहकांना तालुक्यातील ९ उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा करण्यात येतो. सेलू तालुक्यात व परिसरात एकही ...

देवगावफाटा : सेलू तालुक्यातील ३४ हजार वीज ग्राहकांना तालुक्यातील ९ उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा करण्यात येतो. सेलू तालुक्यात व परिसरात एकही १३२ केव्हीचे केंद्र नसल्याने वीज समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना दिवसा तर सोडाच अर्ध्या रात्रीही कृषीपंप सुरू करावा लागतो. त्यामुळे बळीराजासह वीज ग्राहक महावितरणच्या कारभाराविरुद्ध संतप्त झाले आहेत.

छोट्या-मोठ्या उद्योगांसह घराघरांत विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. या अनुषंगाने सेलू तालुक्यात सद्यस्थितीत २३ हजार घरगुती, ४०० औद्योगिक तर १० हजार ५३० कृषीपंपधारकांनी वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा घेतला आहे. या ग्राहकांना वेळेत व सुरळीत वीजपुरवठा करण्याचे काम महावितरण कंपनीचे आहे. मात्र, शहरासह तालुक्यात तोकड्या वीज सुविधांअभावी वीज ग्राहकांना भारनियमनासह तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत शहरासह तालुक्यातील ३४ हजार वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी नऊ ३३ केव्ही उपकेंद्र अस्तित्वात आहेत. यामध्ये ७ ग्रामीण भागात तर दाेन उपकेंद्र सेलू शहरात आहेत. या उपकेंद्रातून वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या ३३ उपकेंद्रांना जिंतूर, पाथरी व जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील १३२ केव्ही केंद्रांमधून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे रात्री-अपरात्री अनेक अडचणींचा सामना वीज ग्राहकांसह कृषीपंपधारक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. दिवसेंदिवस कृषीपंप व वीज ग्राहकांची संख्या वाढत असल्याने मागणीच्या तुलनेत वीज कमी पडत आहे. त्यामुळे कृषी विद्युत वाहिनीसाठी १६ तासांचे भारनियमन सुरू केले आहे. यासाठी ठरलेल्या वेळेनुसार सलग सात दिवस सकाळी ९.२० ते दुपारी ५.२० असे आठ तास व त्यानंतरचे सलग सात दिवस रात्री ११.२० ते सकाळी ९.२० असे १० तास वीजपुरवठा केला जातो. त्यातही तांत्रिक अडचणींच्या नावाखाली अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे १३२ केव्ही केंद्रासाठी इतर तालुक्यांवर अवलंबून न राहता सेलू तालुक्यात हे केंद्र उभारावेत, अशी मागणी सेलूकरांमधून होत आहे.

१५ दिवस रात्रीच द्यावे लागते पाणी

वीज वितरण कंपनीच्या वतीने महिन्यात जवळपास शेतकऱ्यांना १५ दिवस रात्री ११ वाजता शेतात जावून कृषीपंप सुरु करावा लागतो. रात्री जनावरांची भीती असतानाही नाईलाजाने शेतकऱ्यांना हा धोका पत्करून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देवून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करून भारनियमन कमी करावे, अशी मागणी होत आहे.

भारिनयमनाचे वेळापत्रक हे शासन व महावितरणच्या मध्यवर्ती कार्यालयातून ठरविले जाते. परंतु, कृषी वाहिनीवर दिवसभरात भारनियमन करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी असली तरी वरिष्ठांचे निर्देश टाळू शकत नाहीत. ज्या गावात ग्रामपंचायतीच्या मालकीची दहा एकर जमीन आहे आणि त्या ग्रामस्थांची मागणी असेल तर त्या ठिकाणी दोन मेगावॅटचा सौर प्लँट कार्यान्वित करून शेतकऱ्यांना दिवसभर वीजपुरवठा करता येईल., असे शासनाचे निर्देश आहेत.

एस.एम. आरगडे, उपकार्यकारी अभियंता.