शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
3
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
4
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी, क्रिप्टो मार्केट आपटलं; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
6
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
7
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
8
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
9
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
10
IND vs SA 2nd Test Pitch Report: गुवाहाटीत ‘मुंबई पॅटर्न’? पिच ‘कोणाला’ देणार साथ?
11
Health Crisis: कितीही अँटिबायोटिक खाल्ले तरीही होईना काही परिणाम; जीवाणूंची शक्ती वाढली, आरोग्य धोक्यात!
12
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
13
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
14
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
15
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
16
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
17
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
18
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
19
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
20
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
Daily Top 2Weekly Top 5

३४ हजार वीज ग्राहकांचा भार ९ उपकेंद्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST

देवगावफाटा : सेलू तालुक्यातील ३४ हजार वीज ग्राहकांना तालुक्यातील ९ उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा करण्यात येतो. सेलू तालुक्यात व परिसरात एकही ...

देवगावफाटा : सेलू तालुक्यातील ३४ हजार वीज ग्राहकांना तालुक्यातील ९ उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा करण्यात येतो. सेलू तालुक्यात व परिसरात एकही १३२ केव्हीचे केंद्र नसल्याने वीज समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना दिवसा तर सोडाच अर्ध्या रात्रीही कृषीपंप सुरू करावा लागतो. त्यामुळे बळीराजासह वीज ग्राहक महावितरणच्या कारभाराविरुद्ध संतप्त झाले आहेत.

छोट्या-मोठ्या उद्योगांसह घराघरांत विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. या अनुषंगाने सेलू तालुक्यात सद्यस्थितीत २३ हजार घरगुती, ४०० औद्योगिक तर १० हजार ५३० कृषीपंपधारकांनी वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा घेतला आहे. या ग्राहकांना वेळेत व सुरळीत वीजपुरवठा करण्याचे काम महावितरण कंपनीचे आहे. मात्र, शहरासह तालुक्यात तोकड्या वीज सुविधांअभावी वीज ग्राहकांना भारनियमनासह तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत शहरासह तालुक्यातील ३४ हजार वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी नऊ ३३ केव्ही उपकेंद्र अस्तित्वात आहेत. यामध्ये ७ ग्रामीण भागात तर दाेन उपकेंद्र सेलू शहरात आहेत. या उपकेंद्रातून वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या ३३ उपकेंद्रांना जिंतूर, पाथरी व जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील १३२ केव्ही केंद्रांमधून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे रात्री-अपरात्री अनेक अडचणींचा सामना वीज ग्राहकांसह कृषीपंपधारक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. दिवसेंदिवस कृषीपंप व वीज ग्राहकांची संख्या वाढत असल्याने मागणीच्या तुलनेत वीज कमी पडत आहे. त्यामुळे कृषी विद्युत वाहिनीसाठी १६ तासांचे भारनियमन सुरू केले आहे. यासाठी ठरलेल्या वेळेनुसार सलग सात दिवस सकाळी ९.२० ते दुपारी ५.२० असे आठ तास व त्यानंतरचे सलग सात दिवस रात्री ११.२० ते सकाळी ९.२० असे १० तास वीजपुरवठा केला जातो. त्यातही तांत्रिक अडचणींच्या नावाखाली अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे १३२ केव्ही केंद्रासाठी इतर तालुक्यांवर अवलंबून न राहता सेलू तालुक्यात हे केंद्र उभारावेत, अशी मागणी सेलूकरांमधून होत आहे.

१५ दिवस रात्रीच द्यावे लागते पाणी

वीज वितरण कंपनीच्या वतीने महिन्यात जवळपास शेतकऱ्यांना १५ दिवस रात्री ११ वाजता शेतात जावून कृषीपंप सुरु करावा लागतो. रात्री जनावरांची भीती असतानाही नाईलाजाने शेतकऱ्यांना हा धोका पत्करून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देवून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करून भारनियमन कमी करावे, अशी मागणी होत आहे.

भारिनयमनाचे वेळापत्रक हे शासन व महावितरणच्या मध्यवर्ती कार्यालयातून ठरविले जाते. परंतु, कृषी वाहिनीवर दिवसभरात भारनियमन करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी असली तरी वरिष्ठांचे निर्देश टाळू शकत नाहीत. ज्या गावात ग्रामपंचायतीच्या मालकीची दहा एकर जमीन आहे आणि त्या ग्रामस्थांची मागणी असेल तर त्या ठिकाणी दोन मेगावॅटचा सौर प्लँट कार्यान्वित करून शेतकऱ्यांना दिवसभर वीजपुरवठा करता येईल., असे शासनाचे निर्देश आहेत.

एस.एम. आरगडे, उपकार्यकारी अभियंता.