शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

३४ हजार वीज ग्राहकांचा भार ९ उपकेंद्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST

देवगावफाटा : सेलू तालुक्यातील ३४ हजार वीज ग्राहकांना तालुक्यातील ९ उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा करण्यात येतो. सेलू तालुक्यात व परिसरात एकही ...

देवगावफाटा : सेलू तालुक्यातील ३४ हजार वीज ग्राहकांना तालुक्यातील ९ उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा करण्यात येतो. सेलू तालुक्यात व परिसरात एकही १३२ केव्हीचे केंद्र नसल्याने वीज समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना दिवसा तर सोडाच अर्ध्या रात्रीही कृषीपंप सुरू करावा लागतो. त्यामुळे बळीराजासह वीज ग्राहक महावितरणच्या कारभाराविरुद्ध संतप्त झाले आहेत.

छोट्या-मोठ्या उद्योगांसह घराघरांत विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. या अनुषंगाने सेलू तालुक्यात सद्यस्थितीत २३ हजार घरगुती, ४०० औद्योगिक तर १० हजार ५३० कृषीपंपधारकांनी वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा घेतला आहे. या ग्राहकांना वेळेत व सुरळीत वीजपुरवठा करण्याचे काम महावितरण कंपनीचे आहे. मात्र, शहरासह तालुक्यात तोकड्या वीज सुविधांअभावी वीज ग्राहकांना भारनियमनासह तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत शहरासह तालुक्यातील ३४ हजार वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी नऊ ३३ केव्ही उपकेंद्र अस्तित्वात आहेत. यामध्ये ७ ग्रामीण भागात तर दाेन उपकेंद्र सेलू शहरात आहेत. या उपकेंद्रातून वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या ३३ उपकेंद्रांना जिंतूर, पाथरी व जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील १३२ केव्ही केंद्रांमधून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे रात्री-अपरात्री अनेक अडचणींचा सामना वीज ग्राहकांसह कृषीपंपधारक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. दिवसेंदिवस कृषीपंप व वीज ग्राहकांची संख्या वाढत असल्याने मागणीच्या तुलनेत वीज कमी पडत आहे. त्यामुळे कृषी विद्युत वाहिनीसाठी १६ तासांचे भारनियमन सुरू केले आहे. यासाठी ठरलेल्या वेळेनुसार सलग सात दिवस सकाळी ९.२० ते दुपारी ५.२० असे आठ तास व त्यानंतरचे सलग सात दिवस रात्री ११.२० ते सकाळी ९.२० असे १० तास वीजपुरवठा केला जातो. त्यातही तांत्रिक अडचणींच्या नावाखाली अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे १३२ केव्ही केंद्रासाठी इतर तालुक्यांवर अवलंबून न राहता सेलू तालुक्यात हे केंद्र उभारावेत, अशी मागणी सेलूकरांमधून होत आहे.

१५ दिवस रात्रीच द्यावे लागते पाणी

वीज वितरण कंपनीच्या वतीने महिन्यात जवळपास शेतकऱ्यांना १५ दिवस रात्री ११ वाजता शेतात जावून कृषीपंप सुरु करावा लागतो. रात्री जनावरांची भीती असतानाही नाईलाजाने शेतकऱ्यांना हा धोका पत्करून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देवून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करून भारनियमन कमी करावे, अशी मागणी होत आहे.

भारिनयमनाचे वेळापत्रक हे शासन व महावितरणच्या मध्यवर्ती कार्यालयातून ठरविले जाते. परंतु, कृषी वाहिनीवर दिवसभरात भारनियमन करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी असली तरी वरिष्ठांचे निर्देश टाळू शकत नाहीत. ज्या गावात ग्रामपंचायतीच्या मालकीची दहा एकर जमीन आहे आणि त्या ग्रामस्थांची मागणी असेल तर त्या ठिकाणी दोन मेगावॅटचा सौर प्लँट कार्यान्वित करून शेतकऱ्यांना दिवसभर वीजपुरवठा करता येईल., असे शासनाचे निर्देश आहेत.

एस.एम. आरगडे, उपकार्यकारी अभियंता.