शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आयुष्यभराची साथ सहा महिन्यातच तुटली; हातावरची मेहंदी उतरण्यापूर्वीच जोडप्याचा टोकाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 13:00 IST

सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचे राहत्या घरात आढळले मृतदेह

पूर्णा (परभणी) : लग्नात आयुष्यभर साथ देण्याचे एकमेकांना वचन देणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याने सहा महिन्यातच टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपविल्याची घटना रविवारी सकाळी तालुक्यातील कातनेश्वर येथे उघडकीस आली आहे. गंगाधर विश्वनाथ चापके (२५) आणि सपना गंगाधर चापके (२१) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. गंगाधर चापके आणि सपना चापके यांचा साधारणत: सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर हातावरची मेहंदी उतरण्यापूर्वीच अवघ्या काही महिन्यातच या दोघांनीही विष प्राशन करून मृत्यूला कवटाळल्याने गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कातनेश्वर येथील पोलीस पाटील ज्ञानोबा काटकर यांना एका ग्रामस्थाने फोन करून चापके यांच्या घरी काहीतरी अनुचित घडले आहे, अनेकवेळा आवाज देऊनही चापके दाम्पत्य दरवाजा उघडत नाहीत अशी माहिती दिली. गंगाधर (२५) आणि सपना गंगाधर चापके (२१) या दाम्पत्याचा सहा महिन्यांपूर्वीचा विवाह झाला होता. सर्वकाही सुरळीत सुरु असताना अचानक असा फोन आल्याने पोलीस पाटील व ग्रामस्थांनी लागलीच चापके यांच्या घरी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडला असता गंगाधर जमिनीवर तर सपना पलंगावर मृतावस्थेत पडल्याचे आढळून आल्याने ग्रामस्थांना धक्काच बसला. दोघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून येत होते. त्यानंतर पूर्णा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, कर्मचारी घाटे, जमादार रणखांब यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दरम्यान, ९ जानेवारी रोजी कात्नेश्वर येथे एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पूर्णा तालुक्यात २ दिवसात तिघांची आत्महत्याशनिवारी पूर्णा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील शास्त्री नगर येथील ३८ वर्षीय तरुण राजू शंकर लहाने याने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यांनतर रविवारी कात्नेश्वर येथील दाम्पत्याने आत्महत्या केली. पूर्णा तालुक्यात २ दिवसात तिघांनी आत्महत्या केल्याने चिंता व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी