शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

तिकडे बजेटमध्ये कोटींच्या घोषणा, इकडे साधा पूल होईना; विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 12:48 IST

फुलवाडीतील विद्यार्थी जीव धोक्यात घालून गिरवत आहेत आयुष्याचे धडे

जिंतूर : तालुक्यातील फुलवाडी येथे ओढ्यावरील पुलाचे काम न झाल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या गावातील विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षणच नव्हे तर आयुष्याचे धडे गिरवत आहेत. याचे प्रशासनाला, राजकीय मंडळींना गांभीर्य नसल्याने ग्रामस्थांना दर पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यास अशीच जीवघेणी कसरत करावी लागते.

आडगाव- इटोली रस्त्यावर जवळपास ५०० लोकसंख्या असलेले फुलवाडी हे छोटेसे गाव. मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत जाण्यासाठी केवळ ५०० - ७०० फुटाचे अंतर आहे. तत्कालीन खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या फंडातून या ठिकाणी रस्ता करण्यात आला होता. त्यानंतर ठक्कर बाप्पा योजनेतून सात लाख रुपये खर्चून पुन्हा रस्ता झाला. मात्र, गाव आणि पाटी यांना जोडणारा पुलाचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हा पूर्ण रस्ता पाण्याखाली जातो. गावातून पहिली ते बारावी पर्यंत चे शंभर ते सव्वाशे विद्यार्थी बाहेर गावाच्या वेगवेगळ्या शाळेमध्ये शिक्षणासाठी जातात. काही विद्यार्थी आश्रम शाळेत काही विद्यार्थी गडदगव्हाण तर काही विद्यार्थी आडगाव बाजार येथे शिक्षणासाठी दररोज जाणेयेणे करतात. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. 

मोठा पाऊस येऊन ओढ्याला पाणी आले तर विद्यार्थ्यांना कधी गडदगव्हाण तर कधी आडगावला मुक्काम करावा लागतो. शेतात मजुरीसाठी गेलेल्या लोकांनाही पाण्यामुळे गावात येत नाही. पाणी कमी झाल्यानंतर पालकाच्या मदतीने ओढा ओलांडून विद्यार्थी शाळेत जातात. ही तारेवरची कसरत मागील अनेक वर्षापासून या भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थ करीत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा पुल मंजूर करावा अशी मागणी होत आहे. पुलासाठी मोठा खर्च आहे पण येथे मतदार संख्या कमी असल्याने कोणतेच राजकीय नेतृत्व पुलाच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. आज देशाचे बजेट सादर करताना करोडोंच्या योजनांच्या घोषणा झाल्या, मात्र इकडे वर्षानुवर्ष मागणी करूनही ओढ्यावर साधा पूल होत नाही, अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. 

आता तर बस ही बंदआडगाव इटोली मार्गावर नेहमी धावणाऱ्या बस व शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या मानव विकासच्या बस मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. आडगाव -इटोली रस्त्यावर काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर गिट्टी अंथरूण ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील बस बंद असल्याचे दिसत आहे. यामुळे  शाळकरी मुलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे

हे चित्र केव्हा बदलणारजिंतूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे या रस्त्यांच्या प्रश्नाकडे जिल्हा परिषद विभागाचे कोणतेही लक्ष नाही. एकीकडे कोट्यावधी रुपयांचे बजेट खर्च करीत असताना गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

अनेक वर्षांपासून जीवघेणा प्रवासफुलवाडी येथील पुलाच्या कामाच्या संदर्भात अनेक वेळा प्रशासकीय, राजकीय पातळीवर पाठपुरावा केला. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. मागील अनेक वर्षापासून विद्यार्थी जीवघेणा प्रवास करीत आहेत. - श्रीरंग राठोड, ग्रामस्थ, गडद गव्हाण

टॅग्स :Schoolशाळाparabhaniपरभणी