शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये निम्माच पाणीसाठा शिल्लक; आरक्षित पाण्याच्या संरक्षणाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 18:10 IST

परभणी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि गाव तलावांमध्ये क्षमतेच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ तसेच येलदरीसारख्या मोठ्या प्रकल्पात अवघा ५ टक्के पाणीसाठा असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची चिंता वाढली असून, टंचाई काळामध्ये हे पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे सिंचन प्रकल्प आणि गाव तलावांमध्ये क्षमतेच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़येलदरीसारख्या मोठ्या प्रकल्पात अवघा ५ टक्के पाणीसाठा असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची चिंता वाढली आहे

परभणी : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि गाव तलावांमध्ये क्षमतेच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ तसेच येलदरीसारख्या मोठ्या प्रकल्पात अवघा ५ टक्के पाणीसाठा असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची चिंता वाढली असून, टंचाई काळामध्ये हे पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली़ येलदरी आणि निम्न दूधना या दोन मोठ्या प्रकल्पांबरोबरच दोन मध्यम प्रकल्प आणि २२ लघु प्रकल्पांवर जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे़ गतवर्षी परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा जमा झाला नाही़ परिणामी यावर्षी उन्हाळ्यातील टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ जिल्हा प्रशासनाने सुमारे ४१८ गावे संभाव्य पाणीटंचाईची घोषित केली आहेत़ या गावांना होणारा पाणीपुरवठा हा मुख्य प्रकल्पांमधूनच केला जातो़ त्याच प्रमाणे प्रकल्पातील पाणीसाठा घटत असल्याने परिसरातील भुजल पातळीतही लक्षणीय घट होत आहे़ परिणामी आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट जानेवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच तीव्र होत असल्याचे दिसत  आहे. 

परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यांचा आढावा घेतला तेव्हा बहुतांश प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यापर्यंतच पाणीसाठा उपलब्ध असल्याचे दिसत आहे़ क्षमतेच्या तुलनेत प्रकल्पातील पाणीसाठा कमी असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली आहे़ सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पात ६३़६७ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे़ या प्रकल्पाची पाणी क्षमता ३४४़८०० दलघमी एवढी आहे़ यात २४२़२०० दलघमी जीवंत पाणीसाठा असतो़ यावर्षी प्रकल्पामध्ये १५४़२०० दलघमी जीवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ तर झरी येथील प्रकल्पामध्ये ०़९१६ दलघमी, करपरा मध्यम प्रकल्पात १३़३७३ दलघमी, मासोळी प्रकल्पात ३़३६८ दलघमी, डिग्रस बंधार्‍यात ३१़८९० दलघमी, मुदगल बंधार्‍यात ८़५६० दलघमी, ढालेगाव ७़८०० दलघमी आणि पिंपळदरी तलावामध्ये ०़७०१ दघलमी पाणीसाठा शिल्लक आहे़ गतवर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना करता यावर्षी प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे.

मुळी बंधारा कोरडाठाकगंगाखेड तालुक्यातील मुळीचा बंधारा पावसाळ्यापासूनच कोरडाठाक आहे़ केवळ नियोजन नसल्याने या बंधार्‍यात पाणीसाठा झाला नाही़ बंधार्‍याचे दरवाजे खराब झाले आहेत़ भर पावसाळ्यात बंधार्‍याला दरवाजे बसविणे अपेक्षित होते़ परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले़ त्यामुळे बंधार्‍यातील सर्व पाणी वाहून गेले आहे़ ११़३५० दलघमी क्षमतेचा हा बंधारा असून, सध्या बंधार्‍यामध्ये १़२४२ दलघमी पाणी आहे़ तर जीवंत पाणीसाठा उपलब्धच नाही़ त्यामुळे हा बंधारा कोरडाठाक पडला असून, गंगाखेड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ गंगाखेड शहरातील निम्म्या भागाला मुळी बंधार्‍यातून पाणीपुरवठा केला जातो़ मात्र बंधारा कोरडा असल्याने आता या भागाला मासोळी प्रकल्पातून पाणी द्यावे लगणार आहे़ 

येलदरी प्रकल्पात साडेपाच टक्के पाणीजिंतूर तालुक्यातील येलदरी हा परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे़ मात्र याच प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत़ ९३४़४४ दलघमीचा हा प्रकल्प असून, त्यात केवळ ४४़३१२ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ विशेष म्हणजे गतवर्षी देखील या प्रकल्पात समाधानकारक पाणी उपलब्ध नव्हते़ गतवर्षी २६़३ टक्के पाणीसाठा होता़ यावर्षी तो ५़४७ टक्क्यांवर घसरला आहे़ येलदरी प्रकल्पावर येलदरी गावासह जिंतर शहर, जिंतूर तालुक्यातील शेकडो गावे त्याच प्रमाणे परभणी शहर, पूर्णा, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हिंगोली या मोठ्या शहरांचाही पिण्याच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे़ परभणी, पूर्णा या गावांसह हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हिंगोली गावांनाही पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी लागणार आहे़ 

‘निम्न दूधना’चाच आधारमागील वर्षीपासून सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पाचा जिल्ह्याला मोठा आधार झाला होता़ मागील वर्षी या प्रकल्पातून परभणी शहरासाठी पाणी घेण्यात आले़ विशेष म्हणजे यावर्षी देखील परभणी आणि पूर्णा या दोन्ही शहरांसाठी प्रकल्पातून पाणी घेतले आहे़ निम्न दूधना प्रकल्पात ६३ टक्के पाणी उपलब्ध असून, या पाण्यावरच परभणी शहरासह पूर्णा, सेलू आणि मानवत या चार मोठ्या शहरांबरोबरच चारही तालुक्यांतील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी