शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

चार कोटींच्या निधीवर पुढाऱ्यांचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:15 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. मागील काही वर्षात केंद्र सरकारने वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना निधी देताना ...

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. मागील काही वर्षात केंद्र सरकारने वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना निधी देताना महत्त्व दिले आहे. निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात वितरीत करण्यात येत असल्याने गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कोविडमुळे मागील ७-८ महिन्यांपासून निवडणुका रखडल्या होत्या. याकाळात ग्रामपंचायतीवर प्रशासकही नेमण्यात आले होते. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारकडून १५व्या वित्त आयोगअंतर्गत ग्रामपंचायतीच्या खात्यात थेट निधी वर्ग करण्यात आला आहे. यावेळेस १५व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना अनेक नवीन नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच धनादेशाने व्यवहार करण्यात आल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झालेला निधी अद्याप खर्च करण्यात आला नाही. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी होत आहेत. त्यातील ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३८ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. गावागावात पार्ट्याना ऊत आला आहे. दारूचे बॉक्स रिचविले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील बाभळगाव, हदगाव, कासापुरी, कानसूर, उमरा, लिंबा, गुंज खु या प्रमुख गावातील निवडणुकीत तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यातच ग्रामपंचायतींच्या खात्यावर असलेल्या ३ कोटी ९४ लाख १४ हजार रुपयांच्या निधीवरही या पुढाऱ्यांचा डोळा आहे.

दोन टप्प्यात आलेला निधी

१५व्या वित्त आयोगाच्या निधीतून तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींना दोन टप्प्यात ३ कोटी ९४ लाख १४ हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. अद्याप एकाही ग्रामपंचायतीचा निधी खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे नवीन निवडून येणाऱ्या मंडळींना ग्रामपंचायत स्तरावर सत्ता मिळवल्यानंतर विकासकामासाठी तातडीने निधी खर्च करता येणार आहे.