शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर पाच गावांचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 13:11 IST

पालम (परभणी ) : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने लेंडी नदीला पूर आला असून, शनिवारी सकाळी ८ वाजेपासून पाच गावांचा संपर्क ताालुक्याशी तुटला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा या गावांचा संपर्क तुटण्याची घटना घडली.पालम ते जांभुळबेट या रस्त्यावर शहरापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात केवळ ३ फूट उंचीचा ...

पालम (परभणी ) : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने लेंडी नदीला पूर आला असून, शनिवारी सकाळी ८ वाजेपासून पाच गावांचा संपर्क ताालुक्याशी तुटला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा या गावांचा संपर्क तुटण्याची घटना घडली.

पालम ते जांभुळबेट या रस्त्यावर शहरापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात केवळ ३ फूट उंचीचा जुना पूल आहे. पाऊस पडताच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याचा प्रकार वारंवार घडतो. २३ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी वाढत गेल्याने या पुलावर ६ फूट पाणी वहात होते. त्यामुळे फळा, आरखेड, सोमेश्वर, घोडा, उमरथडी या गावांचा संपर्क चार तासांपासून तुटला आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुलावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी ८ ते १२ या चार तासांसाठी मात्र पाचही गावांतील ग्रामस्थांना अडकून पडावे लागले. यापूर्वी ३ जून रोजी या गावांचा संपर्क तुटला होता.

भाविकांची गैरसोयफळा येथे संत मोतीराम महाराज यांची समाधी आहे. प्रत्येक एकादशीला भाविकांची येथे दर्शनासाठी रांग लागते. शनिवारी एकादशी असल्याने भाविक फळा गावाकडे निघाले. मात्र वाटेत पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, अनेक भागात प्रत्यक्ष पेरण्यांना सुरुवात केली आहे. आठ दिवसांपासून जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या होत्या. या पावसामुळे शेतकरी पेरता झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसriverनदीfloodपूरparabhaniपरभणी