शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर पाच गावांचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 13:11 IST

पालम (परभणी ) : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने लेंडी नदीला पूर आला असून, शनिवारी सकाळी ८ वाजेपासून पाच गावांचा संपर्क ताालुक्याशी तुटला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा या गावांचा संपर्क तुटण्याची घटना घडली.पालम ते जांभुळबेट या रस्त्यावर शहरापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात केवळ ३ फूट उंचीचा ...

पालम (परभणी ) : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने लेंडी नदीला पूर आला असून, शनिवारी सकाळी ८ वाजेपासून पाच गावांचा संपर्क ताालुक्याशी तुटला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा या गावांचा संपर्क तुटण्याची घटना घडली.

पालम ते जांभुळबेट या रस्त्यावर शहरापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात केवळ ३ फूट उंचीचा जुना पूल आहे. पाऊस पडताच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याचा प्रकार वारंवार घडतो. २३ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी वाढत गेल्याने या पुलावर ६ फूट पाणी वहात होते. त्यामुळे फळा, आरखेड, सोमेश्वर, घोडा, उमरथडी या गावांचा संपर्क चार तासांपासून तुटला आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुलावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी ८ ते १२ या चार तासांसाठी मात्र पाचही गावांतील ग्रामस्थांना अडकून पडावे लागले. यापूर्वी ३ जून रोजी या गावांचा संपर्क तुटला होता.

भाविकांची गैरसोयफळा येथे संत मोतीराम महाराज यांची समाधी आहे. प्रत्येक एकादशीला भाविकांची येथे दर्शनासाठी रांग लागते. शनिवारी एकादशी असल्याने भाविक फळा गावाकडे निघाले. मात्र वाटेत पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, अनेक भागात प्रत्यक्ष पेरण्यांना सुरुवात केली आहे. आठ दिवसांपासून जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या होत्या. या पावसामुळे शेतकरी पेरता झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसriverनदीfloodपूरparabhaniपरभणी