शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

जिंतुरात सव्वादोन हजार घरकुलांची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

जिंतूर : तालुक्यातील २ हजार २८४ घरकुलांच्या लाभार्थ्यांना शासनाकडून १७ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचा निधी मिळाला नसल्याने ...

जिंतूर : तालुक्यातील २ हजार २८४ घरकुलांच्या लाभार्थ्यांना शासनाकडून १७ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचा निधी मिळाला नसल्याने या घरकुलांची कामे अर्धवट आहेत. यामुळे लाभार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिंतूर पंचायत समितीच्या वतीने २०१६-१७, २१७-१८ आणि २०१८-१९ या तीन वर्षांत ८८१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ८१२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, ६९ घरकुले अर्धवट आहेत. ८८१ पैकी ३७९ घरकुलांच्या लाभार्थ्यांना चौथा हप्ता मिळालेला नाही तर७५ घरकुल लाभार्थ्यांना तिसरा आणि ३९ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळणे बाकी आहे. याच योजनेंतर्गत २०१९-२० व २०२०-२१ या वर्षात ४३७ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यातील केवळ ६४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल ३७३ घरकुलांची कामे अपूर्ण आहेत.

रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७, २०१७-१८ या दोन वर्षांत २ हजार ८९६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी २ हजार ३५६ घरकुले पूर्ण झाली आहेत. ५४० घरकुलांचे काम अद्यापही अर्धवट आहे. तर २०१९-२० या वर्षात या योजनेत २४७ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यातील एकाही घरकुलाचे काम अद्याप सुरू झाले नाही.

शबरी आवास योजनेंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांत ४०७ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यापैकी केवळ ११२ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. पारधी आवास योजनेंतर्गत २०१७ ते २०१९ या कालावधीत ९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ७ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरकुलांची कामे अर्धवट आहेत. अनेक लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर झाल्यानंतर जुने घर पाडून नवीन घरकूल बांधण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांना वेळेवर शासनाचे अनुदान मिळाले नसल्याने त्यांच्या घराची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे ते सध्या अडचणीत सापडले आहेत.

१७ कोटी २५ लाखांची आवश्यकता

तालुक्यातील विविध योजनांतर्गत घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांच्या अनुदानापोटी १७ कोटी २५ लाख ५० हजार रुपये शासनाकडून येणे बाकी आहेत. त्यात ७४२ घरकुलांची पहिल्या हप्त्याची १ कोटी ११ लाख रुपयांची, दुसऱ्या हप्त्याची २ हजार २५२घरकुलांची ५ कोटी ६३ हजार ४० हजार, १ हजार ४८५ घरकुल लाभार्थ्यांची तिसऱ्या हप्त्याची ५ कोटी ९४ हजार आणि २ हजार २८४ घरकुलांच्या चौथ्या हप्त्याची ४ कोटी ५६ लाख ८० हजार अशी एकूण १७ कोटी २५लाख ५० हजार रुपयांची शासनाकडून रक्कम येणे बाकी आहे.