शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शेतात जाणे अन् पुलाचे काम करणेही अवघड, अखेर ढालेगाव बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 12:09 IST

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गोपेगावजवळील पुलाचे काम करण्यासाठी ढालेगाव बंधाऱ्याच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आली

- विठ्ठल भिसे पाथरी (परभणी ) : गोदावरी नदीच्या काठावरील  गोपेगाव जवळील पूलाला  ढालेगाव बंधाऱ्याचे बॅकवॉटरचे पाणी साचून राहात  असल्याने या पुलावरील वाहतूक बंद पडली होती. पुलाचे काम करण्यासाठी बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. यानुसार 1 मार्च रोजी रात्री 9 वाजता ढालेगाव बंधाऱ्यातून तब्बल 3 .68 दलमी पाण्याचा विसर्ग खालच्या बंधाऱ्यात करण्यात आला आहे.  पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील बंधाऱ्याचे बॅकवॉटर गोदावरी नदीच्या काठावर जवळपास 22 किमी आहे. बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन पाणी अडविण्यात आल्यानंतर बॅक वॉटरच्या पाण्याचा फटका गोपेगाव आणि मरडस गाव येथील शेतकऱ्यांना बसला आहे. गोपेगावजवळील पुलाला बॅक वॉटरचे पाणी साचून राहत असल्याने या पुलाच्या पाण्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुलाला बारमाही पाणी राहत असल्याने या भागातील जवळपास 150  शेतकऱ्यांना शेतीसाठी पर्यायी सात ते आठ किमी अंतर कापून शेत गाठावे लागत होते. मागील काही वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी  भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते मुंजाभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली पुलासाठी सातत्याने जायकवाडी विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. 

दरम्यान, पुलाचे काम करण्यासाठी ढालेगाव बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने लघु पाटबंधारे विभागाकडे  केली होती. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लघु पाठबंधारे विभागाने ढालेगाव बंधाऱ्यातीलपाणी पातळी कमी  करण्यासंदर्भात आदेश दिले. त्यानुसार 1 मार्च रोजी रात्री 9 ते पहाटे 2 वाजेच्या दरम्यान ढालेगाव येथील बंधाऱ्यातून 8800 क्युसेक ने 3.630 दलघमी पाण्याचा विसर्ग खालच्या मुदगल आणि तारुगव्हाण बंधाऱ्यात करण्यात आला.  ढालेगाव बंधाऱ्यात 7.80 दलघमी पाणी साठा..गोदावरी नदीच्या पात्रात तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याची पाणी क्षमता 14.87 दलघमी इतकी आहे. 1 मार्च रोजी बंधाऱ्यातून 3.630 दलघमी पाणी सोडण्यात आल्यानंतर आता या बंधाऱ्यात 7.80 दलघमी जिवंत पाणी साठा आहे. म्हणजेच बंधाऱ्यात आज 57.76 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे 

आंदोलनाला यशगोपेगाव जवळील पुलाचे काम करण्यात यावे यासाठी मागील काही वर्षे येथील शेतकरी संघर्ष करत होते. शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने तोडगा काढत पुलासाठी बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी केला. हे शेतकऱ्यांच्या लढ्याचे यश आहे. - ज्ञानेश्वर काळे

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरी