शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

शेतात जाणे अन् पुलाचे काम करणेही अवघड, अखेर ढालेगाव बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 12:09 IST

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गोपेगावजवळील पुलाचे काम करण्यासाठी ढालेगाव बंधाऱ्याच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आली

- विठ्ठल भिसे पाथरी (परभणी ) : गोदावरी नदीच्या काठावरील  गोपेगाव जवळील पूलाला  ढालेगाव बंधाऱ्याचे बॅकवॉटरचे पाणी साचून राहात  असल्याने या पुलावरील वाहतूक बंद पडली होती. पुलाचे काम करण्यासाठी बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. यानुसार 1 मार्च रोजी रात्री 9 वाजता ढालेगाव बंधाऱ्यातून तब्बल 3 .68 दलमी पाण्याचा विसर्ग खालच्या बंधाऱ्यात करण्यात आला आहे.  पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील बंधाऱ्याचे बॅकवॉटर गोदावरी नदीच्या काठावर जवळपास 22 किमी आहे. बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन पाणी अडविण्यात आल्यानंतर बॅक वॉटरच्या पाण्याचा फटका गोपेगाव आणि मरडस गाव येथील शेतकऱ्यांना बसला आहे. गोपेगावजवळील पुलाला बॅक वॉटरचे पाणी साचून राहत असल्याने या पुलाच्या पाण्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुलाला बारमाही पाणी राहत असल्याने या भागातील जवळपास 150  शेतकऱ्यांना शेतीसाठी पर्यायी सात ते आठ किमी अंतर कापून शेत गाठावे लागत होते. मागील काही वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी  भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते मुंजाभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली पुलासाठी सातत्याने जायकवाडी विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. 

दरम्यान, पुलाचे काम करण्यासाठी ढालेगाव बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने लघु पाटबंधारे विभागाकडे  केली होती. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लघु पाठबंधारे विभागाने ढालेगाव बंधाऱ्यातीलपाणी पातळी कमी  करण्यासंदर्भात आदेश दिले. त्यानुसार 1 मार्च रोजी रात्री 9 ते पहाटे 2 वाजेच्या दरम्यान ढालेगाव येथील बंधाऱ्यातून 8800 क्युसेक ने 3.630 दलघमी पाण्याचा विसर्ग खालच्या मुदगल आणि तारुगव्हाण बंधाऱ्यात करण्यात आला.  ढालेगाव बंधाऱ्यात 7.80 दलघमी पाणी साठा..गोदावरी नदीच्या पात्रात तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याची पाणी क्षमता 14.87 दलघमी इतकी आहे. 1 मार्च रोजी बंधाऱ्यातून 3.630 दलघमी पाणी सोडण्यात आल्यानंतर आता या बंधाऱ्यात 7.80 दलघमी जिवंत पाणी साठा आहे. म्हणजेच बंधाऱ्यात आज 57.76 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे 

आंदोलनाला यशगोपेगाव जवळील पुलाचे काम करण्यात यावे यासाठी मागील काही वर्षे येथील शेतकरी संघर्ष करत होते. शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने तोडगा काढत पुलासाठी बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी केला. हे शेतकऱ्यांच्या लढ्याचे यश आहे. - ज्ञानेश्वर काळे

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरी