शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शेतात जाणे अन् पुलाचे काम करणेही अवघड, अखेर ढालेगाव बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 12:09 IST

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गोपेगावजवळील पुलाचे काम करण्यासाठी ढालेगाव बंधाऱ्याच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आली

- विठ्ठल भिसे पाथरी (परभणी ) : गोदावरी नदीच्या काठावरील  गोपेगाव जवळील पूलाला  ढालेगाव बंधाऱ्याचे बॅकवॉटरचे पाणी साचून राहात  असल्याने या पुलावरील वाहतूक बंद पडली होती. पुलाचे काम करण्यासाठी बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. यानुसार 1 मार्च रोजी रात्री 9 वाजता ढालेगाव बंधाऱ्यातून तब्बल 3 .68 दलमी पाण्याचा विसर्ग खालच्या बंधाऱ्यात करण्यात आला आहे.  पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील बंधाऱ्याचे बॅकवॉटर गोदावरी नदीच्या काठावर जवळपास 22 किमी आहे. बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन पाणी अडविण्यात आल्यानंतर बॅक वॉटरच्या पाण्याचा फटका गोपेगाव आणि मरडस गाव येथील शेतकऱ्यांना बसला आहे. गोपेगावजवळील पुलाला बॅक वॉटरचे पाणी साचून राहत असल्याने या पुलाच्या पाण्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुलाला बारमाही पाणी राहत असल्याने या भागातील जवळपास 150  शेतकऱ्यांना शेतीसाठी पर्यायी सात ते आठ किमी अंतर कापून शेत गाठावे लागत होते. मागील काही वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी  भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते मुंजाभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली पुलासाठी सातत्याने जायकवाडी विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. 

दरम्यान, पुलाचे काम करण्यासाठी ढालेगाव बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने लघु पाटबंधारे विभागाकडे  केली होती. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लघु पाठबंधारे विभागाने ढालेगाव बंधाऱ्यातीलपाणी पातळी कमी  करण्यासंदर्भात आदेश दिले. त्यानुसार 1 मार्च रोजी रात्री 9 ते पहाटे 2 वाजेच्या दरम्यान ढालेगाव येथील बंधाऱ्यातून 8800 क्युसेक ने 3.630 दलघमी पाण्याचा विसर्ग खालच्या मुदगल आणि तारुगव्हाण बंधाऱ्यात करण्यात आला.  ढालेगाव बंधाऱ्यात 7.80 दलघमी पाणी साठा..गोदावरी नदीच्या पात्रात तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याची पाणी क्षमता 14.87 दलघमी इतकी आहे. 1 मार्च रोजी बंधाऱ्यातून 3.630 दलघमी पाणी सोडण्यात आल्यानंतर आता या बंधाऱ्यात 7.80 दलघमी जिवंत पाणी साठा आहे. म्हणजेच बंधाऱ्यात आज 57.76 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे 

आंदोलनाला यशगोपेगाव जवळील पुलाचे काम करण्यात यावे यासाठी मागील काही वर्षे येथील शेतकरी संघर्ष करत होते. शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने तोडगा काढत पुलासाठी बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी केला. हे शेतकऱ्यांच्या लढ्याचे यश आहे. - ज्ञानेश्वर काळे

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरी