शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

परभणी महापालिकेचे दुर्लक्ष: नालीतील पाणी मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:42 IST

शहरातील शिवाजी चौक परिसरातील मुख्य बाजारपेठेतील नाले तुडूंब भरल्याने या नाल्यातील पाणी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास थेट रस्त्यावरुन वाहू लागले. त्यामुळे या रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या नागरिकांना या घाण पाण्यातूनच मार्ग काढावा लागल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील शिवाजी चौक परिसरातील मुख्य बाजारपेठेतील नाले तुडूंब भरल्याने या नाल्यातील पाणी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास थेट रस्त्यावरुन वाहू लागले. त्यामुळे या रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या नागरिकांना या घाण पाण्यातूनच मार्ग काढावा लागल्याचे दिसून आले.परभणी शहरातील नगरपालिकेचे रुपांतर सात वर्षापूर्वी महानगरपालिकेत झाले. शहरातील रस्ते, नाल्या, वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण या मुलभूत सुविधांची गरज महापालिका प्रशासन पूर्ण करेल, अशी अपेक्षा शहरवासियांना होती. या मुलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी सात वर्षामध्ये महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग केला; परंतु, सद्यस्थितीत रस्ते प्रभाग समिती अ, ब व क या तिही समित्यांपैकी बहुतांश रस्त्यावरुन नागरिकांना आजही ये-जा करण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यानंतर राहटी बंधारा व निम्न दुधना प्रकल्प तुडूंब भरले असतानाही शहरवासियांना पाण्यासाठी १२ ते १५ दिवस वाट पहावी लागते. शिक्षणाच्या बाबतीत तर महानगरपालिकेकडे असणाºया शाळा लयास गेल्या आहेत. या शाळेतील शिक्षकांना १२ महिन्यांपासून मनपाकडून पगारच देण्यात आलेला नाही. शहरातील प्रत्येक प्रभागातील नाल्या दुरुस्ती व नवीन तयार करण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो; परंतु, शहराच्या परिस्थितीमध्ये कोणताच बदल सध्या तरी दिसून येत नाही. शहरातील शिवाजी चौक परिसरातील मुख्य बाजारपेठेतील नाले शुक्रवारी सकाळीच तुडूंब भरुन वाहू लागले. या नाल्यातील पाणी रस्त्यावरुन वाहत होते. या परिसरात कापड दुकाने व बाजारपेठ असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते; परंतु, ३१ आॅगस्ट रोजी सकाळी या रस्त्यावरुन ये-जा करणाºया नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच मार्गस्थ व्हावे लागले; याकडे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी तरी प्रयत्न करावेत, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.मनपाच्या बैठका नावालाचमहानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या व नगरसेवकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व सुविधा पुरविण्यासाठी सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठका आयोजित करण्यात येतात. या बैठकांमध्ये मनपाकडून करण्यात आलेली कामे व नागरिकांना पुरविण्यात येणाºया सुविधा व अडीअडचणी संदर्भात मोठी चर्चा होते; परंतु, या बैठका संपल्याच्या नंतर नागरिकांना सोयी- सुविधा पुरविण्यासाठी कोणतेच ठोस पाऊले उचलण्यात येत नाहीत. त्यामुळे सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठका नावालाच होतात का? असा प्रश्न शहरवासियांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाWaterपाणी