शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

परभणी महापालिकेचे दुर्लक्ष: नालीतील पाणी मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:42 IST

शहरातील शिवाजी चौक परिसरातील मुख्य बाजारपेठेतील नाले तुडूंब भरल्याने या नाल्यातील पाणी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास थेट रस्त्यावरुन वाहू लागले. त्यामुळे या रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या नागरिकांना या घाण पाण्यातूनच मार्ग काढावा लागल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील शिवाजी चौक परिसरातील मुख्य बाजारपेठेतील नाले तुडूंब भरल्याने या नाल्यातील पाणी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास थेट रस्त्यावरुन वाहू लागले. त्यामुळे या रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या नागरिकांना या घाण पाण्यातूनच मार्ग काढावा लागल्याचे दिसून आले.परभणी शहरातील नगरपालिकेचे रुपांतर सात वर्षापूर्वी महानगरपालिकेत झाले. शहरातील रस्ते, नाल्या, वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण या मुलभूत सुविधांची गरज महापालिका प्रशासन पूर्ण करेल, अशी अपेक्षा शहरवासियांना होती. या मुलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी सात वर्षामध्ये महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग केला; परंतु, सद्यस्थितीत रस्ते प्रभाग समिती अ, ब व क या तिही समित्यांपैकी बहुतांश रस्त्यावरुन नागरिकांना आजही ये-जा करण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यानंतर राहटी बंधारा व निम्न दुधना प्रकल्प तुडूंब भरले असतानाही शहरवासियांना पाण्यासाठी १२ ते १५ दिवस वाट पहावी लागते. शिक्षणाच्या बाबतीत तर महानगरपालिकेकडे असणाºया शाळा लयास गेल्या आहेत. या शाळेतील शिक्षकांना १२ महिन्यांपासून मनपाकडून पगारच देण्यात आलेला नाही. शहरातील प्रत्येक प्रभागातील नाल्या दुरुस्ती व नवीन तयार करण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो; परंतु, शहराच्या परिस्थितीमध्ये कोणताच बदल सध्या तरी दिसून येत नाही. शहरातील शिवाजी चौक परिसरातील मुख्य बाजारपेठेतील नाले शुक्रवारी सकाळीच तुडूंब भरुन वाहू लागले. या नाल्यातील पाणी रस्त्यावरुन वाहत होते. या परिसरात कापड दुकाने व बाजारपेठ असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते; परंतु, ३१ आॅगस्ट रोजी सकाळी या रस्त्यावरुन ये-जा करणाºया नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच मार्गस्थ व्हावे लागले; याकडे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी तरी प्रयत्न करावेत, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.मनपाच्या बैठका नावालाचमहानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या व नगरसेवकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व सुविधा पुरविण्यासाठी सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठका आयोजित करण्यात येतात. या बैठकांमध्ये मनपाकडून करण्यात आलेली कामे व नागरिकांना पुरविण्यात येणाºया सुविधा व अडीअडचणी संदर्भात मोठी चर्चा होते; परंतु, या बैठका संपल्याच्या नंतर नागरिकांना सोयी- सुविधा पुरविण्यासाठी कोणतेच ठोस पाऊले उचलण्यात येत नाहीत. त्यामुळे सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठका नावालाच होतात का? असा प्रश्न शहरवासियांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाWaterपाणी