शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने परभणी जिल्ह्यावर अन्याय - खासदार जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 18:21 IST

जिल्ह्यात भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्ह्यावर अन्याय होत आहे. यातूनच विदर्भ - मराठवाड्याच्या विशेष योजनेच्या पॅकेजमधून जिल्ह्याला वगळण्यात आले आहे असा सणसणीत आरोप खासदार बंडू जाधव यांनी आज केला. ते शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर शिवेसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या महा जन मोर्चाचे नेतृत्व करताना बोलत होते.

ठळक मुद्देमोर्चात जिल्हाभरातून शेतक-यांचा समावेश  महावितरण, महापालिका, पोलीस प्रशासनावर व्यक्त केला रोष

परभणी : जिल्ह्यात भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्ह्यावर अन्याय होत आहे. यातूनच विदर्भ - मराठवाड्याच्या विशेष योजनेच्या पॅकेजमधून जिल्ह्याला वगळण्यात आले आहे असा सणसणीत आरोप खासदार बंडू जाधव यांनी आज केला. ते शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर शिवेसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या महा जन मोर्चाचे नेतृत्व करताना बोलत होते.

शहरातील शनिवार बाजार येथून दुपारी १ वाजेच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबरोबरच जिल्ह्यातील अवैध धंदे, व्यापार्‍यांचा एलबीटी प्रश्न, महापालिकेने वाढविलेली घरपट्टी, जिल्ह्यातील ठप्प झालेले रोजगार हमी योजनेची कामे अशा विविध समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आली. 

भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने दुजाभाव खा. बंडू जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर झालेल्या सभेतील भाषणात सांगितले कि, शेतकर्‍यांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रशासनाच्याविरुद्ध हा मोर्चा आहे. राज्य शासनाने विशेष योजनांसाठी पॅकेज जाहीर केले. विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्याला हे पॅकेज देण्यात आले. मात्र, परभणी जिल्ह्याला यातून वगळण्यात आले. जिल्ह्यात भाजपाचा आमदार, खासदार नसल्याने दुजाभाव केला जात आहे. हे पैसे मिळाले असते तर जिल्ह्यातील ३ हजार वीज जोडण्या सुरु झाल्या असत्या. 

ढोल-ताशाच्या गजरात निघाला मोर्चा शनिवार बाजार येथून खा. बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशाच्या गजरात हा मोर्चा निघाला. शनिवार बाजार, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधीपार्क, अष्टभूजा देवी मंदिर, नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. भगवे रुमाल आणि भगवे झेंडे घेऊन जिल्हाभरातील शिवसैैनिक व शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, खा.बंडू जाधव, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ.संजय कच्छवे, उपजिल्हाप्रमुख सदाशीव देशमुख, प्रभाकर वाघीकर, संतोष मुरकुटे, राम खराबे, विष्णू मांडे, बाळासाहेब जाधव, अतुल सरोदे, संजय सारणीकर, माणिक पोंढे आदींसह सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. 

प्रारंभी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणांमधून भाजप सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनावर तोफ डागली.  यावेळी राम पाटील, जिल्हाप्रमुख कच्छवे, आणेराव, डॉ.नावंदर यांची भाषणे झाली. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाparabhaniपरभणीFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण