शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

परभणी जिल्ह्यात कापूस, सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:25 IST

पावसाचा ताण पडल्याने एकीकडे पाण्याअभावी सुकत असलेल्या जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला असून, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे टाकले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: पावसाचा ताण पडल्याने एकीकडे पाण्याअभावी सुकत असलेल्या जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला असून, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे टाकले आहे़जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मागील काही वर्षांपासून कापसाच्या बरोबरीने सोयाबीनचा पेरा घेतला जातो़ ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या दृष्टीने पैसा देणारी पिके आहेत़ त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत कापूस, सोयाबीनच्या वाढीसाठी शेतकरी अधिक दक्ष असतात़ यावर्षी पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्यामध्ये साधारणत: अडीच लाख हेक्टरवर सोयाबीन आणि दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे़ पावसाने ताण दिल्यामुळे ही दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच कोमेजून जाण्याच्या स्थितीत आहेत़ जिल्ह्यात काही भागात पडलेल्या पावसामुळे या पिकांना जीवदान तर मिळाले़ परंतु, ढगाळ वातावरण आणि पावसाचा ताण यामुळे किडीचा प्रादुर्भावही वाढला आहे़ कीड नियंत्रण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहेत़ मात्र शेतकºयांनी शास्त्रीय दृष्टीकोणातून कीड व्यवस्थापन केले तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो़ या पार्श्वभूमीवर येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकºयांना कीड नियंत्रणाविषयी सल्ले दिले आहेत़कोणत्या पिकावर कोणती कीडजिल्ह्यामध्ये कपाशीच्या पिकावर प्रामुख्याने माव्याचा प्रादुर्भाव आढळत आहे़ काही भागात तुडतुडे व गुलाबी बोंडअळीच्या डोमकळ्या आढळल्या आहेत़ हवामान ढगाळ असल्यामुळे व कपाशीचे पीक पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रिय झाल्याचे दिसत आहे़ मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात़ त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे़ सोयाबीन पिकावर प्रामुख्याने चक्री भुंगा, कोंडीका तसेच पाने खाणाºया अळीचा प्रादुर्भाव आढळला आहे़कपाशीसाठी काय करावे?कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करून डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात, गुलाबी बोंडअळीसाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत, प्रती सापळा सरासरी ८ ते १० पतंग सतत दोन-तीन दिवस आढळून आल्यास ही आर्थिक नुकसानीची पातळी समजावी व योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी़ गुलाबी बोंडअळीचे पतंग मोठ्या प्रमाणात गोळा करून नष्ट करण्यासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत, उपलब्धतेप्रमाणे एकरी ३ ट्रायकोकार्ड पानाच्या खालच्या बाजुस लावावेत, तसेच इंग्रजी टी आकाराचे पक्षीथांबे हेक्टरी ४० या प्रमाणात लावावेत़ फुल किडीच्या व्यवस्थानासाठी निळे चिकट सापळे तर पांढºया माशीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत़सोयाबीन पिकासाठीसोयाबीन पिकामध्ये चक्री भुंगा, कोंडीका अळी, पाने खाणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरॅन ट्रानिलीप्रोल १८़५ एससी प्रति १० लिटर पाण्यात ४ मिली मिसळून फवारणी करावी तसेच फ्लूबेंडामाईड ३९़३५ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावे, थायामिथीझाम १२़६ टक्के अधिक लॅमडा साहॅलोथ्रीन ९़५ टक्के झेडसी प्रति ४ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन किटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ संजीव बंटेवाड, किटकशास्त्रज्ञ डॉ़ पुरुषोत्तम झंवर, डॉ़ अनंत बडगुजर, डॉ़ कृष्णा अंभोरे यांनी केले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी