शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
2
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
3
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
4
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
5
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
6
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
7
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
8
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
9
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
10
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
11
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
12
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
13
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
14
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
15
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
16
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
17
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
18
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
19
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
20
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन एज्युकेशनमुळे पालकांचा वाढला खर्च; मोबाईल, टॅब, इंटरनेटची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST

जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे या माध्यमातूनच घ्यावे, लागत आहेत. इतर ...

जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे या माध्यमातूनच घ्यावे, लागत आहेत. इतर कुठलाही पर्याय नसल्याने पालक नाईलाजाने का होईना यासाठी आर्थिक भार उचलत आहेत. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल किंवा टॅब किंवा लॅपटॉप घेणे अनिवार्य आहे. यासोबतच यासाठी इंटरनेट जोडणी आवश्यक आहे. त्यासाठी जवळपास ३० ते ३५ हजारांचा खर्च वाढला आहे. कोरोनामुळे अगोदरच अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात ऑनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या साधनांची जुळवाजुळव करताना सर्वसामान्य पालक हैराण झाले आहेत. अशातच विद्यार्थ्यांना जास्तवेळ स्क्रीनवर जात असल्याने डोळ्यांच्या समस्या येत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ऑफलाईन शिक्षणाची आस लागली आहे.

मोबाईल किंवा संगणक आणि इंटरनेट

n ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा संगणक किंवा टॅब आवश्यक आहे. या साधनांसाठी जवळपास ३० ते ३५ हजारांचा पालकांना खर्च येत आहे शिवाय इंटरनेटचे दर महिन्याला रिचार्ज करणे आवश्यक आहे.

n यासोबतच विद्यार्थ्यांना शाळेतील फी पूर्णपणे भरावी लागत आहे. न्यायालयाने कोरोनाकाळातील फी कमी करण्याचा सर्व व्यवस्थापनांना आदेश देऊनही काही शाळा या आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पूर्ण फी घेतली जात आहे. त्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. घरी मुलांसाठी मोबाईल नव्हता. त्याच्यासाठी मोबाईल घेतला. त्यानंतर आता या मोबाईलसाठी प्रत्येक महिन्याला दीडशे रुपयांचा इंटरनेट खर्च वाढला आहे. तसेच हेडफोन व इतर खर्चही वाढला आहे. ऑफलाईन शाळा असती तर खर्च टळला असता.

- पुंडलिक गायकवाड, पालक

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे लागत आहे. त्यासाठी नवीन मोबाईल खरेदी करावा लागला. पूर्वी मुलांच्या हातात मोबाईल दिला जात नव्हता. मात्र, ऑनलाईन शिक्षणासाठी तो द्यावा लागत आहे. त्यातून प्रत्येक महिन्याच्या इंटरनेट खर्चाचीही भर पडली आहे. मागील दोन वर्षांपासून शिक्षणासाठी हा खर्च वाढला आहे.

- अशोक सोळंके, पालक

मुलांचे होतेय नुकसान

खरंतर कोरोनाच्या संसर्ग काळातही मुलांना घरी बसून शिक्षण मिळतेय ही खूप मोठी गोष्ट आहे. मात्र, त्यात काही डिसॲडव्हांटेजही आहेत. ग्रामीण भागात छोट्या स्क्रीनवर सतत राहून अभ्यासात कॉन्स्ट्रेट करावे लागते. स्क्रीनचा वापर वाढल्याने मुलांच्या नजरेवर परिणाम होऊ शकतो. तसेच इतर दुष्परिणामही होतात.

- डाॅ.सुभाष काळे, मानसोपचार तज्ज्ञ