शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

एकाच खिडकीमुळे प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:18 IST

परभणी : येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना आरक्षण तिकीट काढण्यासाठी एकच खिडकी सुरू ठेवण्यात आली आहे. अलिकडच्या काळात रेल्वे गाड्यांची ...

परभणी : येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना आरक्षण तिकीट काढण्यासाठी एकच खिडकी सुरू ठेवण्यात आली आहे. अलिकडच्या काळात रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. मात्र, रेल्वे स्थानकावर एकच तिकीट खिडकी सुरू ठेवली जाते. त्यामुळे प्रवाशांना रांग लावून आरक्षण तिकीट काढावे लागत आहे. रेल्वे गाड्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता, तिकीट खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

वाहनतळाअभावी वाहतूक विस्कळीत

परभणी : येथील बसस्थानक परिसरात वाहनतळाची सुविधा नसल्याने बसस्थानकाच्या परिसरात अस्ताव्यस्त वाहने लावली जात आहेत. त्यामुळे स्थानकातून बस बाहेर काढताना आणि स्थानकात बस आणताना चालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या बसस्थानक तात्पुरत्या स्वरुपात चालवले जाते. या भागात वाहनतळाचीही स्वतंत्र सुविधा निर्माण करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

परभणी : शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. सुपर मार्केट ते नवा मोंढा हा रस्ता असाच खड्डेमय झाला आहे. कारेगाव रोड भागातील २५ ते ३० वसाहतींसाठी हा प्रमुख रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

जलवाहिनी जोडण्याचे काम लांबले

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यान परिसरातील जलकुंभाला जलवाहिनी जोडण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. सहा दिवसात हे काम पूर्ण होईल, असे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मनपा प्रशासनाने जलवाहिनी जलकुंभाला जोडण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

पाण्याअभावी वाळू लागली झाडे

परभणी : शहरातील जिंतूर रस्ता आणि वसमत रस्त्याच्या दुभाजकावरील झाडे वाळू लागली आहेत. जिल्ह्यात आता उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. त्यामुळे दुभाजकावरील झाडांना पाणी देण्याची नितांत आवश्यकता आहे. मनपा प्रशासनाने दुभाजकावर लावलेल्या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

शासकीय कार्यालयात वाढली अस्वच्छता

परभणी : जिल्हाभरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छता वाढली आहे. येथील प्रशासकीय इमारत परिसरात ही परिस्थिती दिसून येते. या भागात अनेक शासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. मात्र, इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. फरश्या उखडल्या असून, भिंतींचे कोपरे पान खाऊन थुंकल्याने रंगले आहेत.