शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
3
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
4
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
5
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
6
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
7
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
8
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
9
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
10
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
11
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
12
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
13
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
14
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
15
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
16
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
17
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
18
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
19
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
20
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

ऐन उन्हाळ्यात कॅनलचा भराव फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी, अनेकांची शेती वाहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 12:11 IST

पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारात घडली घटना

 - विठ्ठल भिसे

पाथरी( परभणी): वरच्या भागातील शेतकऱ्यांननी दोन मायनर बंद केल्याने पाण्याचा दाब अचानक वाढला जाऊन  मुख्य कॅनॉल च्या बँकींगचा  भराव फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारामध्ये  बी 59 कॅनल वर  शुक्रवार 25 मार्च रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे .दरम्यान पाण्यात शेतकऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणावर घासून गेली असून ऊस तोड मजुरांच्या खोप्यात पाणी शिरले आहे ,

 

 

  पैठण धरण्याच्या डाव्या कालव्यातून सध्या उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी पाळी सुरू आहे ,   पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील मुख्य  डावा कालवा पासून बी 59 ही वितरीका आहे या वितरिकेवर  देवनांदर ते   कुंभारी शिवारा पर्यंत जायकवाडीचे पाणी पोहचते .याच वितरिकेवर वाघाला शिवारातील जमीन येते ,सध्या वितरिका मधून पाणी सोडण्यात आले आहे  शुक्रवार २५ मार्च रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास वाघाळा येथील शेतकरी जयराम नवले यांच्या  गट क्रं २८३ शेतामध्ये  बी ५९ कॅनॉलला करण्यात आलेल्या मातीच्या भरावाला पाण्याच्या दाबाने अचानक भगदाड पडले या. वितरिके वर वरच्या भागातील शेतकऱ्यांनी आपले सिंचन झाल्या नंतर 2 मायनर बंद केल्याने पाण्याचा दाब वाढला त्या  मुळे भरावा फुटला गेला , विशेष म्हणजे कालवा तयार झाल्या पासून हा भरावं केलेला आहे  

  पूर्ण क्षमतेने भरून जात असलेल्या कॅनॉल मधून लाखो लिटर पाणी शेजारील शेतामधून एक किमी अंतर पर्यन्त शेतात  वाहून  गेले .  याच शेतकऱ्याचा सध्या ऊस तोडणी सुरू आहे ऊस तोडणी साठी या शेतामध्ये  आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोप्यांमध्ये पाणी शिरल्याने ऊसतोड मजुरांचे संसारोपयोगी साहित्य भिजून गेले आहे . फुटलेली कॅनॉल बँकिंग   जेसीबी मशीनचा वापर करत माती, मेनकापड व कडबा च्या सहाय्याने स्थानिक शेतकऱ्याने  तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केला आहे  .

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरी