शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

'न्याय मिळाला नाही तर जीव देणार...'; मयत सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी यांची उदविग्नता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:59 IST

परभणी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 

परभणी : मयत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला. सोमनाथच्या मृत्यूला दीड महिना उलटला तरी अद्यापही राज्य शासनाकडून पोलिसांवर गुन्हा नोंद झाला नाही. प्रशासन चौकशी सुरू आहे, असे नेहमीच सांगत आहे. न्याय मिळाला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव देणार, तेव्हांच प्रशासन माझी दखल घेईल, सध्या सरकार झोपेत असल्याची उदविग्नता मयत सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई यांनी गुरुवारी व्यक्त केली.

मृत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना न्याय द्यावा आणि कोंबिंग कारवाईत मारहाण होऊन जखमी झालेल्या नागरिकांना न्याय देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील शनिवार बाजार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

वंचित बहुजन आघाडीने काढलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये विजयाबाई सूर्यवंशी यांच्यासह कुटुंबीयसुद्धा सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आले असता विजयाबाई सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी न्याय मागणीसाठी दाद मागितली. यावेळी न्याय घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. यानंतर मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधला. वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन दिले जात आहेत. मात्र, या निवेदनाला आणि यातील मागण्यांना जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने पहावे. या निवेदनाला केराची टोपली दाखवू नये. न्याय मिळावा यासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे सूर्यवंशी कुटुंबाने याप्रसंगी सांगितले.

मृत सोमनाथ सूर्यवंशी, आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे, सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवाराला एक कोटी रुपये अर्थसाहाय्य देऊन परिवारातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या स्मारकाला शहरात जागा उपलब्ध करून द्यावी, मारहाण करणाऱ्या पोलिसांविरोधात तत्काळ गुन्हे नोंद करावेत, शिवाय अन्य १२ प्रमुख मागणी करण्यात आल्या. या सर्व मागण्यांसाठी हा मोर्चा काढला होता. राज्य शासनाने याबाबत योग्य ती कारवाई करावी व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. मोर्चात राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, राज्य महासचिव अनिल जाधव, अरुण जाधव, राज्य सदस्य अविनाश भोसीकर, धम्मपाल सोनटक्के, सुनील मगरे, तुकाराम भारती, सुनीता साळवे, रणजित मकरंद, तुषार गायकवाड, गणेश गाडे, प्रमोद कुटे, दिलीप मोरे, गौतम रणखांबे, शिवाजी वाकळे, चंद्रमोरे, माला साळवे, कमलेश ठेंगे, प्रमोद अंभोरे, अविनाश सावंत, आनंदा भेरजे यांच्यासह पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी