शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

'न्याय मिळाला नाही तर जीव देणार...'; मयत सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी यांची उदविग्नता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:59 IST

परभणी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 

परभणी : मयत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला. सोमनाथच्या मृत्यूला दीड महिना उलटला तरी अद्यापही राज्य शासनाकडून पोलिसांवर गुन्हा नोंद झाला नाही. प्रशासन चौकशी सुरू आहे, असे नेहमीच सांगत आहे. न्याय मिळाला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव देणार, तेव्हांच प्रशासन माझी दखल घेईल, सध्या सरकार झोपेत असल्याची उदविग्नता मयत सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई यांनी गुरुवारी व्यक्त केली.

मृत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना न्याय द्यावा आणि कोंबिंग कारवाईत मारहाण होऊन जखमी झालेल्या नागरिकांना न्याय देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील शनिवार बाजार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

वंचित बहुजन आघाडीने काढलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये विजयाबाई सूर्यवंशी यांच्यासह कुटुंबीयसुद्धा सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आले असता विजयाबाई सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी न्याय मागणीसाठी दाद मागितली. यावेळी न्याय घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. यानंतर मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधला. वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन दिले जात आहेत. मात्र, या निवेदनाला आणि यातील मागण्यांना जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने पहावे. या निवेदनाला केराची टोपली दाखवू नये. न्याय मिळावा यासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे सूर्यवंशी कुटुंबाने याप्रसंगी सांगितले.

मृत सोमनाथ सूर्यवंशी, आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे, सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवाराला एक कोटी रुपये अर्थसाहाय्य देऊन परिवारातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या स्मारकाला शहरात जागा उपलब्ध करून द्यावी, मारहाण करणाऱ्या पोलिसांविरोधात तत्काळ गुन्हे नोंद करावेत, शिवाय अन्य १२ प्रमुख मागणी करण्यात आल्या. या सर्व मागण्यांसाठी हा मोर्चा काढला होता. राज्य शासनाने याबाबत योग्य ती कारवाई करावी व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. मोर्चात राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, राज्य महासचिव अनिल जाधव, अरुण जाधव, राज्य सदस्य अविनाश भोसीकर, धम्मपाल सोनटक्के, सुनील मगरे, तुकाराम भारती, सुनीता साळवे, रणजित मकरंद, तुषार गायकवाड, गणेश गाडे, प्रमोद कुटे, दिलीप मोरे, गौतम रणखांबे, शिवाजी वाकळे, चंद्रमोरे, माला साळवे, कमलेश ठेंगे, प्रमोद अंभोरे, अविनाश सावंत, आनंदा भेरजे यांच्यासह पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी