शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: वाळूघाट लिलावाची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी भूविज्ञान खनिकर्म ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असून, साधारणत: दोन महिन्यांमध्ये वाळू घाट खुले होतील, अशी आशा जिल्हावासियांना लागली आहे़तब्बल दीड वर्षांपासून जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे वाळू चोरी वाढली आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत़ त्यामुळे लिलावाअभावी जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून, वाळू घाटांच्या लिलावाची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे़दरम्यान, सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसानंतर सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्याने वाळू उपसा करणेही शक्य नव्हते़ मात्र आता काही वाळू घाटांमधून वाळू उपसा करणे शक्य झाल्याने जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाच्या वतीने ३० वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार केला असून, हा आराखडा मंजुरीसाठी भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे़ खनिकर्म संचालनालयाची मंजुरी मिळाल्यानंतर वाळू घाटांचे लिलाव करण्यासाठी जनसुनावणी घेणे त्यानंतर राज्य समितीच्या बैठकीत या प्रक्रियेला मंजुरी घेणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया होणार आहे़ या सर्व प्रक्रियेला साधारणत: दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांना वाळू घाट खुले होण्यासाठी आणखी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़ असे असले तरी प्रत्यक्षात या प्रक्रियेला सुरुवात झाल्यामुळे जिल्हावासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत़गोदावरी नदीवरील सर्वाधिक घाट४जिल्हा प्रशासनाने खाणकाम आराखडा तयार केलेल्या ३० घाटांमध्ये गोदावरी नदीवरील सर्वाधिक वाळू घाट आहेत़ या नदीवर १८, पूर्णा नदीवरील ७ आणि दूधना नदीवरील ५ वाळू घाटांचा समावेश आहे़४त्याचप्रमाणे पूर्णा तालुक्यातील सर्वाधिक ९ वाळू घाटांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ त्याखालोखाल परभणी तालुक्यातील ५, गंगाखेड तालुक्यातील ४, सेलू, पालम तालुक्यातील प्रत्येकी ३, सोनपेठ, मानवत आणि जिंतूर तालुक्यातील प्रत्येकी २ वाळू घाटांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहेत़जनसुनावणीसाठी एक महिन्याचा कालावधी४वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे़ शासनाच्या नियमानुसार भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाने मंजुरी दिल्यानंतर या प्रस्तावांची जन सुनावणी घेणे आवश्यक आहे़४या सुनावणीसाठी एक महिन्याचा कालावधी निश्चित करून दिला आहे़ त्यामुळे जनसुनावणी वाळू घाटांच्या मंजुरीसाठीच तब्बल एक महिन्याचा कालावधी लागणार आहे़ त्यानंतर जनसुनावणीत मंजूर झालेल्या वाळू घाटांना स्टेट इन्व्हार्नमेंट असेसमेंट कमिटी (एसईएसी) आणि स्टेट इन्व्हार्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अ‍ॅथॉरिटी (एसईआयएए) या दोन समित्यांच्या मंजुरी घेणे आवश्यक आहे़४ही मंजुरी मिळाल्यानंतर ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार असून, या प्रक्रियेनंतर मंजूर झालेल्या वाळू घाटांची रक्कम जमा करून घेण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे़ त्यामुळे किमान दोन महिने येथील नागरिकांना खुल्या वाळूसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे़या वाळू घाटांचे प्रस्ताव सादरजिल्हा खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचे खाणकाम आराखडे तयार केले आहेत़ त्यामध्ये पूर्णा तालुक्यातील गोळेगाव, धनगर टाकळी, पेनूर, कळगाव, धानोरा मोत्या, मुंबर, कानडखेड, पिंपळगाव सारंगी, पिपंळगाव बाळापूर, गंगाखेड तालुक्यातील पिंप्री झोला, महातपुरी, भांबरवाडी, आनंदवाडी, सोनपेठ तालुक्यातील लोहीग्राम, पोहंडूळ, परभणी तालुक्यातील काष्टगाव, जोड परळी, सावंगी खुर्द, नांदगाव खुर्द, पिंपळगाव टोंग, मानवत तालुक्यातील शेवडी जहांगीर, वांगी, सेलू तालुक्यातील खादगाव, मोरेगाव, काजळी रोहिणा, जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके, वझूर-२ आणि पालम तालुक्यातील राहटी, दुटका, धनेवाडी या वाळू घाटांचे खाणकाम आराखडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग