शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

मदत वाऱ्यावरच; रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत राज्यात प्रारंभी ३० एप्रिलपर्यंत आणि नंतर ...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत राज्यात प्रारंभी ३० एप्रिलपर्यंत आणि नंतर १५ मेपर्यंत संचारबंदी लागू केली. त्यामुळे सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने, विविध घटकांना मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी १३ एप्रिल रोजी रात्री घोषित केला होता. त्यात परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेस आत्ता तब्बल २३ दिवस उलटले आहेत, परंतु ही मदत रिक्षाचालकांना मिळालेली नाही. अद्याप प्रशासकीय प्रक्रियाच सुरू आहे. त्यामुळे ही मदत केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

शासनाने खरे तर सर्वच रिक्षा चालकांना मदत देणे आवश्यक आहे. परवानाधारक आणि विनापरवानाधारक असा भेदभाव करण्याची गरज नाही. आम्ही रिक्षा चालवूनही भेदभाव होत असेल, तर रिक्षाचालकांच्या मनात शासनाविषयी अस्था कशी निर्माण होईल?

- अनिल ढवळे

गेल्या दीड महिन्यांपासून संचारबंदीमुळे रिक्षा बंद आहे. शासन नुसत्याच घोषणा करते. प्रत्यक्ष मदत मात्र देत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आता तरी सर्व रिक्षा चालकांना घोषित केली, मदत तातडीने वितरित करावी.

- विश्वनाथ वाघमारे

शासनाला मदत द्यायची असेल, तर तातडीने द्यावी, नुसतीच घोषणा करून नये. मुळातच दीड हजार रुपयांत काय होणार आहे? जवळपास २ महिन्यापासून रिक्षा बंद आहे. या रकमेत महिन्याचे राशन तरी येते का?

-विकास शेळके

राज्य शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षाचालकांची माहिती वरिष्ठ कार्यालयास दिली आहे. अनेक परवानाधारक रिक्षाचालकांचे बँक खाते आधारला जोडलेले आहे, शिवाय आता आरबीआयनेही यास मुदतवाढ दिली आहे. शासनाकडून या संदर्भात येणाऱ्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल.

- श्रीकृष्ण नखाते, उपविभागीय परिवहन अधिकारी

जिल्ह्यातील परवानाधारकांची संख्या २,३२०

परवाना नसलेले रिक्षाचालक ७,७००