जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. राहुल विश्वनाथ पवार हा लातूर येथील एमआयटी महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान त्याचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला. राहुल हा ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. त्याच्या घरची आर्थिक स्थिती नाजूक आहे. कर्ज काढून त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षण दिले. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. राहुलच्या शिक्षणासाठी व उपचारासाठी इतरांकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फेे मदत देण्यात यावी, तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे, असेही या निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, पिंटू कदम, युवराज राठोड, आनंदनगर तांडा सरपंच संगीता पवार, उपसरपंच अनिल राठोड, बंडू पावडे, अनिल पवार आदींची नावे आहेत.
‘मयत राहुल पवार यांच्या कुटुंबीयांना मदत द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST