शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात शेतकरी हवालदिल :पालममध्ये कमी दाबाने वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:24 IST

तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़पालम तालुक्यात सहा ३३ केव्ही उपकेंद्रातून गावठाण व शेतातील कृषीपंपांना वीजपुरवठा केला जातो़ सहा उपकेंद्रांना गंगाखेड येथून केवळ एका वीज वाहिनीवरून वीज पुरवठा केला जात असल्याने तांत्रिक बिघाडात वाढ होत आहे़क्षमतेपेक्षा जास्त विजेची मागणी होत असल्याने तसेच गंगाखेड येथून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने महावितरणच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे़ आठ दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध असूनही विजेच्या कमी दाबामुळे कृषीपंप चालत नाहीत़केरवाडी फिडरला : सर्वाधिक फटकाकेरवाडी फिडरमधून १८ गावांना वीज पुरवठा केला जातो़ दोन विभागात गावे विभागूनही पुरवठा सुरळीत होत नाही़ जुनाट यंत्रणा असल्याने नेहमीच तांत्रिक बिघाड होतात़ गोदाकाठची गावे व कृषीपंपांचा मोठा भार असल्याने या फिडरवरील गावांना नेहमीच वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होत असलयाने फटका सहन करावा लागत आहे़पालम तालुक्यात ग्रामीण भागात विविध फीडरचे लाईनमनच्या मदतीने दोन भाग करून वीज पुरवठा केला जात आहे. पालमच्या केंद्रात २०० एम्पीयरपर्यंत लोड सहन करणारी यंत्रणा आहे. पण फीडर चालू करताच हा भार २३० ते २४० पर्यत जात आहे. त्यामुळे कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे.-व्ही. डी. स्वामी, उपकार्यकारी अभियंता, पालम

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन