शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

परभणी जिल्ह्यात शेतकरी हवालदिल :पालममध्ये कमी दाबाने वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:24 IST

तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़पालम तालुक्यात सहा ३३ केव्ही उपकेंद्रातून गावठाण व शेतातील कृषीपंपांना वीजपुरवठा केला जातो़ सहा उपकेंद्रांना गंगाखेड येथून केवळ एका वीज वाहिनीवरून वीज पुरवठा केला जात असल्याने तांत्रिक बिघाडात वाढ होत आहे़क्षमतेपेक्षा जास्त विजेची मागणी होत असल्याने तसेच गंगाखेड येथून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने महावितरणच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे़ आठ दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध असूनही विजेच्या कमी दाबामुळे कृषीपंप चालत नाहीत़केरवाडी फिडरला : सर्वाधिक फटकाकेरवाडी फिडरमधून १८ गावांना वीज पुरवठा केला जातो़ दोन विभागात गावे विभागूनही पुरवठा सुरळीत होत नाही़ जुनाट यंत्रणा असल्याने नेहमीच तांत्रिक बिघाड होतात़ गोदाकाठची गावे व कृषीपंपांचा मोठा भार असल्याने या फिडरवरील गावांना नेहमीच वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होत असलयाने फटका सहन करावा लागत आहे़पालम तालुक्यात ग्रामीण भागात विविध फीडरचे लाईनमनच्या मदतीने दोन भाग करून वीज पुरवठा केला जात आहे. पालमच्या केंद्रात २०० एम्पीयरपर्यंत लोड सहन करणारी यंत्रणा आहे. पण फीडर चालू करताच हा भार २३० ते २४० पर्यत जात आहे. त्यामुळे कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे.-व्ही. डी. स्वामी, उपकार्यकारी अभियंता, पालम

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन