शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

शेतकऱ्यांची हेळसांड; परभणी जिल्ह्यातील ३३४ गावे अतिवृष्टीच्या यादीतून वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 17:24 IST

३३४ गावे राहणार शासकीय मदतीपासून वंचित

ठळक मुद्देवंचित शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धावसरसकट मदत देण्याची मागणी

परभणी :  बहुतांश मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असताना ३३४ गावांना मात्र अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळण्यात आले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात जिल्ह्यात अनेक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. याशिवाय अतिवृष्टीनंतर ओढ्या- नाल्यांना पूर आल्याने अतिवृष्टीचे मंडळ वगळता इतर मंडळात पुराचे पाणी शिरुन पिकांचे नुकसान झाले आहे.

निम्न दुधना, येलदरी प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने नद्यांना पूर आला. त्यामुळेही पिकांचे नुकसान झाले आहे. असे असताना जिल्ह्यातील ८०४ गावांपैकी केवळ ५१४ गावांमध्येच ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. त्यात ३३४ गावांना मात्र वगळण्यात आले आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार परभणी तालुक्यातील १००, सेलू  : ३३, जिंतूर : ११२, पाथरी ५६, मानवत ५३, सोनपेठ ५२, गंगाखेड ११, पालम २९ आणि पूर्णा तालुक्यातील ६८ गावांतील पिके अतिवृष्टीने बाधित झालेल्या नोंद घेतली आहे. या गावांतील पीक नुकसान भरपाईसाठी १०८ कोटी १५ लाख ८४ हजार रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. त्यामुळे इतर गावांत अतिवृष्टी झाली असतानाही मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे. 

शेतकरी मदतीपासून वंचित राहणार जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली असतानाही त्या गावांचा समावेश अतिवृष्टीच्या यादीत झाला नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. प्रशासनाच्या या कारभाराविरुद्ध शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात असून अतिवृष्टी झालेल्या गावांचा यादीत समावेश करून सरसकट मदत द्यावी, अशी मागणी सोमवारी परभणी, जिंतूर आणि सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाकडे केली आहे. 

अतिवृष्टीने शेतकऱ्यांना फटकाअतिवृष्टीच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सेलू तालुका शाखेनेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सेलू तालुक्यातील कुपटा, वालूर, चिकलठाणा या मंडळांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र महसूल प्रशासनाने या मंडळांना सरसकट मदतीपासून वगळले आहे. तेव्हा या मंडळातील शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर मंचकराव सोळंके, गोपीनाथ सोळंके, आसाराम सोळंके, भीमराव हारके, प्रसाद सोळंके, प्रताप सोळंके, विश्वनाथ वाघमारे, पंढरीनाथ सोळंके, अंकुश सोळंके, कल्याण सोळंके, शरद सोळंके, सिद्धू सोळंके आदींची नावे आहेत.

सरसकट पंचनामे करण्याची मागणीतालुक्यातील कुंभारी बाजार येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तेव्हा पिकांची आणेवारी काढून सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतानाच सलग पंधरा ते वीस दिवस पाऊस झाला. त्यामुळे या पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीक वाया गेले आहे. उत्पन्न न झाल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तेव्हा सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नरसिंग ढेंबरे, ज्ञानोबा ढेंबरे, लक्ष्मण वैद्य, देविदास नवघरे, रावसाहेब नवघरे, सुरेश नवघरे, काशीनाथ जुंबडे, ज्ञानोबा नवघरे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पिंपळगाव ठोंबरे येथील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारतालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे येथील शेतकऱ्यांनीही सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, अतिवृष्टी झाली असताना गावाचे नाव वगळण्यात आले आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे. अतिवृष्टी झाली असतानाही यादीतून गावाचे वगळण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तेव्हा नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी, अशी मागणी पिंपळगाव ठोंबरे येथील ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर ॲड.पद्माकर कुलकर्णी, प्रभाकर ढगे, अशोक रसाळ, भारत ढगे आदींनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसparabhaniपरभणी