शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

परभणी जिल्ह्यातील चार नगरपालिकांना स्वच्छतेसाठी मिळाले दीड कोटीचे प्रोत्साहनपर अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 5:51 PM

नागरी भागामध्ये स्वच्छता अभियानाला गती मिळावी, या उद्देशाने  हगणदारीमुक्त झालेल्या नगरपालिकांना ३० टक्के प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले असून, जिल्ह्यातील चार नगरपालिकांना १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ 

परभणी :  नागरी भागामध्ये स्वच्छता अभियानाला गती मिळावी, या उद्देशाने  हगणदारीमुक्त झालेल्या नगरपालिकांना ३० टक्के प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले असून, जिल्ह्यातील चार नगरपालिकांना १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ 

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जाते़ नागरी भागासाठी असलेल्या या अभियानामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचा समावेश आहे़ मागील एक वर्षांपासून नागरी भागात हे अभियान राबविले जात असून, संपूर्ण परिसर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगरपालिका कामाला लागल्या आहेत़ सार्वजनिक हागणदारीची स्थळे निष्काशीत करण्याबरोबरच वैयक्तीक शौचालय उभारणीचे काम यानिमित्ताने नागरी भागात पूर्ण करण्यात आली़ 

स्वच्छता अभियानाच्या या कामाला गती मिळावी, या उद्देशाने नगरविभाग विभागाच्या वतीने प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते़ प्रत्येक नगरपालिकेला हे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले होते़ स्वच्छता अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, यात केंद्र आणि राज्यस्तरीय समित्यांनी नगरपालिकांनी राबविलेल्या स्वच्छता अभियानाची पाहणीही केली आहे़ या अभियानाच्या अंमलबजावणीपासून आतापर्यंत हागणदारीमुक्त झालेल्या शहरांपैकी राज्यस्तरीय समितीमार्फत केलेल्या तपासणीत जी शहरे हागणदारीमुक्त झाल्याचे दिसून आले़ अशा शहरांना प्रोत्साहन अनुदानाच्या रकमेच्या ३० टक्के निधी पहिला हप्ता म्हणून वितरित करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे़ 

राज्यभरात ६१ नगरपालिका यासाठी पात्र ठरल्या असून, परभणी जिल्ह्यातील चार नगरपालिका ३० टक्के निधीसाठी पात्र ठरल्या आहेत़ शासनाने २९ जानेवारी रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांना तब्बल १ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश निघाले आहेत़ या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिकेला दीड कोटी रुपये प्रोत्साहनपर अनुदान देय असून, त्यापैकी ४५ लाख रुपयांचा निधी पहिला हप्ता म्हणून मंजूर झाला आहे़ तसेच जिंतूर नगरपालिकेलाही दीड कोटी रुपयांपैकी ४५ लाख रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला़ तर पूर्णा नगरपालिका आणि पालम नगरपंचायतींना प्रत्येकी १ कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर आहे़ त्याच्या ३० टक्के ३० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे़ 

जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांमध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे़ या अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने चारही नगरपालिका हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले होते़ त्यामुळे या पालिकांना ३० टक्के अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे़ तर उर्वरित नगरपालिकांमध्ये हे अभियान सध्या गतीने राबविले जात आहे़ या नगरपालिकांची केंद्र व राज्यस्तरीय  पथकाडून लवकरच तपासणी होणार असल्याची माहिती मिळाली़

वैयक्तिक शौचालय : ७१ टक्के बांधकामस्वच्छ महाराष्ट्र राज्य अभियानांतर्गत सात नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये २० हजार ४२१ वैयक्तिक शौचालय उभारणीचे उद्दिष्ट होते़ २९ जानेवारीपर्यंत १४ हजार ५३७ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, आणखी ५ हजार ७७१ शौचालयांचे बांधकाम होणे बाकी आहे़ जिल्ह्यातील नागरी भागात वैयक्तिक शौचालयाचे ७१.७४ टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. वैयक्तिक शौचालयाच्या कामगिरीत जिंतूर नगरपालिका आघाडीवर असून, ८६.४३ टक्के काम या शहरात झाले आहे. त्या खालोखाल सोनपेठ ८५ टक्के, पाथरी ८१ टक्के, पालम ७६ टक्के, मानवत ६७.४१ टक्के, गंगाखेड ६३.१५ टक्के आणि पूर्णा शहरात ५८ टक्के  काम पूर्ण झाले आहे.

सर्व शहरे झाली हागणदारीमुक्तपूर्णा येथे सार्वजनिक हागणदारीची ११ स्थळे होती. तर गंगाखेड शहरात १३, मानवत ६, सेलू ५, सोनपेठ ८, पाथरी ६, जिंतूर ५ आणि पालम शहरात ६ अशी जिल्ह्याच्या नागरी भागात हागणदारीची ६० सार्वजनिक स्थळे होती. या अभियानात ही सर्वच्या सर्व स्थळ निष्काशित झाल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली.

फोटोही अपलोडजिल्ह्यातील पूर्ण झालेल्या १४ हजार ५३७ शौचालयांपैकी १३ हजार ९०८ शौचालयांचे फोटो पोर्टलवर अपलोड झाले आहेत.