शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पाच वर्षांनंतर येलदरीत मत्स्य व्यवसायाला मिळाली उभारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 17:41 IST

मराठवाड्यातील सर्वात मोठा मत्स्य व्यवसाय पुन्हा एकदा उभारी घेत आहे़ 

ठळक मुद्देदीड हजाराहून अधिक कुटूंबियांना आधार मिळाला आहे़गोड्या पाण्यातील येलदरीच्या माशांना वेगळे महत्त्व या प्रकल्पातील माशांना देशभरातून मागणी आहे़

येलदरी (परभणी ) : येलदरी प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याने या भागातील मत्स्य व्यवसायाला तब्बल ५ वर्षानंतर उभारी मिळाली असून, या व्यवसायावर अवलंबून असलेल्या दीड हजार कुटूंबियांना रोजगाराचे हक्काचे साधन उपलब्ध झाले आहे़

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पात मागील चार-पाच वर्षांपासून समाधानकारक पाणीसाठा होत नसल्याने येथील मत्स्य व्यवसाय अडचणीत आला होता़ या प्रकल्पातील माशांना देशभरातून मागणी आहे़ सर्वसाधारणपणे महाराष्ट्रासह इतर राज्यात खाऱ्या पाण्यातील मासे विक्रीसाठी येतात़ त्यामुळे गोड्या पाण्यातील येलदरीच्या माशांना वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते़ येथील मत्स्य व्यवसाय वाढीस लागत असतानाच येलदरी धरणातील पाणीसाठ्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत होती़ मागील ४ ते ५ वर्षांपासून या प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणीसाठा झाल्याने हा व्यवसाय अडचणीत सापडला होता़ 

यावर्षीच्या पावसाळ्याच्या अखेरीसही धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा झाल्याने हे वर्षही  दुष्काळी जाते की काय? अशी शंका वाटत असतानाच १५ आॅक्टोबरनंतर परतीच्या पावसाने जोर धरला़ परिणामी येलदरी प्रकल्पात ९९ टक्क्यापर्यंत पाणीसाठा झाला आहे़ या प्रकल्पात झालेल्या पाणीसाठ्यामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठा मत्स्य व्यवसाय पुन्हा एकदा उभारी घेत आहे़ 

या व्यवसायावर अवलंबून असलेल्या दीड हजाराहून अधिक कुटूंबियांना आधार मिळाला आहे़ येलदरी प्रकल्पात झालेला समाधानकारक पाणीसाठा लक्षात घेता राज्य शासनाच्या मत्स्यसंवर्धन विभागानेही पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे़ या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात मत्स्य बीज सोडून या व्यवसायाला अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे़ 

प्रथमच विकसित केला प्रॉन्सयेलदरी येथील प्रकल्पामध्ये ३-४ वर्षापूर्वी प्रथमच प्रॉन्स मासा विकसित करण्यात आला़ या माशालाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे़ बाजारपेठेत प्रॉन्स माशामुळे मोठी उलाढाल होऊन मत्स्य व्यावसायिकांना आर्थिक लाभही झाला होता़ प्रॉन्सबरोबरच या प्रकल्पामधील झिंग्यालाही मोठी मागणी असून, यावर्षी जलसाठा झाल्याने या दोन्ही माशांचे उत्पादन वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़ 

मत्स्य व्यवसाय होता अडचणीतयेलदरी प्रकल्पामध्ये दरवर्षी पाणीसाठा खालावत असल्याने या प्रकल्पातील माशांचे प्रमाण कमी झाले होते़ त्यामुळे देशभरात मागणी असलेले गोड्या पाण्यातील मासे शिल्लक राहतात की नाही? अशी शंका निर्माण झाली होती़आता धरणात पूर्ण क्षमतेने जलसाठा झाल्यामुळे मत्स्य व्यवसायाला वाव मिळाला असून, गोड्या पाण्यातील मासे पुन्हा एकदा राज्यासह देशभरातील बाजारपेठेत उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे़ 

प्रकल्पात मिळणारे मासेयेलदरी येथील जलाशयात विविध जातींच्या माशांचे उत्पादन केले जाते़ त्यामध्ये कतला, मरळ, चिलापी, बाम, मिरगल, शेंगट, काळूशी, राहू, सुपरनस, वामट या नैसर्गिक गावरान माशांनाही ग्राहकांची मागणी आहे़ त्यामुळे  झिंग्याबरोबरच नैसर्गिक गावरान माशांचेही उत्पादन या जलाशयातून घेतले जाणार आहे़ 

टॅग्स :fishermanमच्छीमारparabhaniपरभणीDamधरणdam tourismधरण पर्यटन