शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

येलदरी धरणातून शेतीसाठी पहिले आवर्तन; ६० हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 16:17 IST

आवर्तन सुटल्याने शेतकरी समाधानी; नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील 60 हजार हेक्टर शेत जमिनीला मिळणार पाणी 

येलदरी वसाहत (परभणी): रब्बी हंगामातील पिकांना पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातून  सिद्धेश्वर धरणात वीज निर्मितीच्या तीन संचापैकी दोन संचामधून दररोज 4 दलघमी एवढे पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील 60 हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

आवर्तन सुरु झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, हळद, ऊस, केळी, आदी पिकासाठी पाणी मिळणार आहे. तसेच येलदरी येथील जल विद्युत केंद्रही सुरू होऊन 15 मेगावाट एवढी वीज निर्मिती सुरू झाली आहे. हे पाणी वीज निर्मितीकरून येलदरीतून सिद्धेश्वर धरणात नदीवाटे नेले जाते. सिद्धेश्वरमधून पूर्णा मुख्य कालवा, हट्टा शाखा कालवा, लासीना शाखा कालवा, वसमत शाखा कालवा व अंतिम शाखा कालवा या पाच कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जल संपदा विभाग नियोजन करत आहे.

या पाच कालव्यामधून परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील मिळून 57 हजार 988 हेक्टर जमीन सिंचनाखाली आलेली आहे. येलदरी येथून सोडलेल्या पाण्यामुळे या भागातील शेतीसह तीन जिल्ह्यातील 250 हून अधिक गावांना देखील पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. यामध्ये परभणी , हिंगोली, पूर्णा, वसमत, जिंतूर,  या मोठ्या शहरांचा समावेश होतो.

सध्या शहरासोबत ग्रामीण भागात शेतकरी जास्तवेळ शेतात घालवत आहेत. कित्येक शेतकऱ्यांना आपले सर्व कुटुंब शेतात राहण्यासाठी नेले आहे. आता शेतीसाठी रब्बी हंगामासाठी येलदरीतून पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने मोठा फायदा होणार आहे. मागील चार वर्षांपासून येलदरी धरण 100 टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप  हंगामात झालेल्या नैसर्गिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

शेतकऱ्यांनी सोडलेल्या पाण्याचा उपयोग योग्य पध्दतीने करावा, तसेच ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा व पाण्याची बचत करावी असे आवाहन जल संपदा विभागाचे नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे,  कार्यकारी अभियंता बिराजदार यांनी उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :DamधरणparabhaniपरभणीagricultureशेतीFarmerशेतकरी