शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दीड वर्षानंतर मानवत रोडवर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 12:54 IST

उड्डाणपुलाचे अंतिम टप्प्यात असणारे काम मागील वर्षभरापासून कासवगतीने सुरु होते.

मानवत :   राष्ट्रीय महामार्गावरील मानवत रोड येथील बायपास उड्डाणपुलाचे रखडलेले काम २४ नोव्हेंबर रोजी सुरु झाले असून हे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. त्यामुळे वाहनधारकांचा त्रास कमी होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या माजलगाव उपविभागांतर्गत मानवत रोडपर्यंतच्या मार्गाचा समावेश होतो. एका बहुराष्ट्रीय कंपनीने दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काम केले आहे. या महामार्गावर मानवत-परभणी दरम्यान मानवत रोड येथे अंतर कमी करण्यासाठी बायपास मार्ग तयार केला जात आहे. या बायपासमुळे परभणीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मानवत रोडवरुन प्रवास करण्याची आवश्यक राहणार नाही. परभणीचे अंतर दोन ते अडीच किमीने कमी होणार आहे. शिवाय जुन्या मार्गावरील नांदेड -मनमाड या लोहमार्गावर उड्डाणपुल नसल्याने दिवसभरात ३५ ते ४० वेळा रेल्वे वाहतूकीसाठी फाटक बंद केले जाते. त्यावेळी रस्ताच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे वाहनांचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

विशेषत: पाथरी व मानवत येथे आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने अत्यवस्थ अवस्थेत रुग्णास परभणीला घेऊन जात असताना अडकून पडावे लागते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन बायपासवर उड्डाणपुल तयार केला आहे; परंतु, या उड्डाणपुलाचे अंतिम टप्प्यात असणारे काम मागील वर्षभरापासून कासवगतीने सुरु होते. हा मार्ग हैदराबाद नांदेड, परभणी, मुंबई, पुणे या मोठ्या शहरांना असल्याने या मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र मानवतरोड येथील बायपासचे काम रखडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  नांदेड-मनमाड या लोहमार्गाच्या दुहेरीकरण कामास मंजुरी मिळाल्याने उड्डाणपुलाच्या उंचीचा प्रश्न निर्माण झाल्याने आतापर्यंत या पुलाचे काम रेंगाळले होते. या पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत होती. शेवटी २४ नोव्हेंबर रोजी या कामाला सुरुवात झाल्याने हा प्रश्न लवकरच सुटणार आहे.

चाचणी घेऊनच : कामाला केला प्रारंभराष्ट्रीय महामार्ग ६१ वर रुढीपाटीपासून एक कि.मी. अंतरावरून परभणीकडे नवीन वळण रस्ता तयार झाला आहे. मात्र या रस्त्यावर उडाणपुलाचे काम पूर्ण झाले नव्हते. दीड वर्षानंतर २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता या पुलाखालून तीन रेल्वे गेल्यानंतर चाचणी घेऊन या पुलाच्या कामाला सुरवात करण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हे काम करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री दाखल झाली असून चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने दिली. 

टॅग्स :railwayरेल्वेparabhaniपरभणीRailway Passengerरेल्वे प्रवासी