शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर आता खत दरवाढीचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST

परभणी : रासायनिक खत कंपन्यांनी खताच्या दरामध्ये गोणीमागे ७०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांवर खत दरवाढीचा भार ...

परभणी : रासायनिक खत कंपन्यांनी खताच्या दरामध्ये गोणीमागे ७०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांवर खत दरवाढीचा भार पडणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने १ लाख ५४ हजार २०० मेट्रिक टन खताची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली होती. त्यापैकी १ लाख १७ हजार ८८८ मेट्रिक टन खत जिल्ह्याला मंजूर झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी हा हंगाम आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. सन २०१७ - १८पासून दुष्काळी परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी शासन, प्रशासनाकडून उभारी देणे गरजेचे असतानाच रासायनिक खताच्या किमतीमध्ये कंपन्यांनी भरमसाठ वाढ केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने दरवर्षी जवळपास ५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले जाते. त्यासाठी आगामी खरीप हंगामात वेगवेगळ्या रासायनिक ९० मेट्रिक टन खतांची गरज जिल्ह्याला भासणार आहे. अशा परिस्थितीमध्ये रासायनिक कंपन्यांनी खताच्या किमती वाढविल्याने बळीराजा हैराण झाला आहे. डीएपी १२०० रुपये प्रतिगोण मिळणारी आता १९०० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यावर्षी प्रत्येकी गोणीमागे ७०० रुपये जास्तीचे माेजावे लागणार आहेत. तर दुसरीकडे १०:२६:२६ खताची ११७० रुपयांना मिळणारी गोण आता १७७५ रुपयांवर पोहोचली आहे. १२:३२:१६ खताची ११८४ रुपयांना मिळणारी गोण आता १८०० रुपयांना खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आगामी खरीप हंगामाचे नियोजन करून १ लाख ५४ हजार २५४ मेट्रिक टन खताची मागणी लातूर येथील विभागीय सहसंचालक कृषी कार्यालयाकडे नोंदविली आहे. त्यानुसार या कार्यालयाने १६ एप्रिलपर्यंत १ लाख १७ हजार ८८० मेट्रिक टन खत मंजूर केला आहे.

१३८४ मेट्रिक टन खताची विक्री

शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिकांसह आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्ह्यातील कृषी दुकानांतून १६ एप्रिलपर्यंत १ हजार ३८४ मेट्रिक टन खत खरेदी केले आहे. त्यामुळे १४ हजार ६५० मेट्रिक टन खत हे मागील हंगामातील शिल्लक आहे. सद्यस्थितीत ३८ हजार ९१० मेट्रिक टन खत जिल्ह्याला उपलब्ध झाले आहे. त्यातून १ हजार ३८४ मेट्रिक टन खत विक्री झाले असून, १६ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ३७ हजार ५२६ मेट्रिक टन खत शिल्लक आहे.