शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

शेतकऱ्यांवर आता खत दरवाढीचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST

परभणी : रासायनिक खत कंपन्यांनी खताच्या दरामध्ये गोणीमागे ७०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांवर खत दरवाढीचा भार ...

परभणी : रासायनिक खत कंपन्यांनी खताच्या दरामध्ये गोणीमागे ७०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांवर खत दरवाढीचा भार पडणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने १ लाख ५४ हजार २०० मेट्रिक टन खताची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली होती. त्यापैकी १ लाख १७ हजार ८८८ मेट्रिक टन खत जिल्ह्याला मंजूर झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी हा हंगाम आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. सन २०१७ - १८पासून दुष्काळी परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी शासन, प्रशासनाकडून उभारी देणे गरजेचे असतानाच रासायनिक खताच्या किमतीमध्ये कंपन्यांनी भरमसाठ वाढ केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने दरवर्षी जवळपास ५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले जाते. त्यासाठी आगामी खरीप हंगामात वेगवेगळ्या रासायनिक ९० मेट्रिक टन खतांची गरज जिल्ह्याला भासणार आहे. अशा परिस्थितीमध्ये रासायनिक कंपन्यांनी खताच्या किमती वाढविल्याने बळीराजा हैराण झाला आहे. डीएपी १२०० रुपये प्रतिगोण मिळणारी आता १९०० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यावर्षी प्रत्येकी गोणीमागे ७०० रुपये जास्तीचे माेजावे लागणार आहेत. तर दुसरीकडे १०:२६:२६ खताची ११७० रुपयांना मिळणारी गोण आता १७७५ रुपयांवर पोहोचली आहे. १२:३२:१६ खताची ११८४ रुपयांना मिळणारी गोण आता १८०० रुपयांना खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आगामी खरीप हंगामाचे नियोजन करून १ लाख ५४ हजार २५४ मेट्रिक टन खताची मागणी लातूर येथील विभागीय सहसंचालक कृषी कार्यालयाकडे नोंदविली आहे. त्यानुसार या कार्यालयाने १६ एप्रिलपर्यंत १ लाख १७ हजार ८८० मेट्रिक टन खत मंजूर केला आहे.

१३८४ मेट्रिक टन खताची विक्री

शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिकांसह आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्ह्यातील कृषी दुकानांतून १६ एप्रिलपर्यंत १ हजार ३८४ मेट्रिक टन खत खरेदी केले आहे. त्यामुळे १४ हजार ६५० मेट्रिक टन खत हे मागील हंगामातील शिल्लक आहे. सद्यस्थितीत ३८ हजार ९१० मेट्रिक टन खत जिल्ह्याला उपलब्ध झाले आहे. त्यातून १ हजार ३८४ मेट्रिक टन खत विक्री झाले असून, १६ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ३७ हजार ५२६ मेट्रिक टन खत शिल्लक आहे.