शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पावसाच्या खंडाने शेतकऱ्यांचा वाढला घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:22 IST

परभणी : पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सध्या शेतकऱ्यांचा घोर वाढविला आहे. आतापर्यंत झालेल्या दमदार पावसाच्या भरवशावर तरारून आलेली ...

परभणी : पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सध्या शेतकऱ्यांचा घोर वाढविला आहे. आतापर्यंत झालेल्या दमदार पावसाच्या भरवशावर तरारून आलेली पिके आता मात्र पावसाचा ताण सहन होत नसल्याने माना टाकत आहेत. कुठे पिके पिवळी पडत आहेत तर कुठे मावा-तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल झाला आहे. नजरेत जीव ओतून आकाशाकडे पाहत शेतकऱ्यांना आता पावसाची आस लागली आहे.

मागच्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस होत आहे. मात्र, तो वेळेला होत नाही. मागील वर्षी खरिपाची पिके हाता-तोंडाशी असताना झालेल्या अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले होते. हे नुकसान पचवून यावर्षी शेतकरी पेरणीसाठी उभा राहिला. जून महिन्यातच दमदार पाऊस झाल्याने वेळेवर पेरण्या झाल्या. पहिल्या दोन महिन्यांत चांगला पाऊस झाल्याने सध्या पिके तरारलेली आहेत. सोयाबीन, कापसाची वाढ समाधानकारक असून, पहिल्या टप्प्यात पेरणी झालेली पिके सध्या फुलोऱ्यात आहेत. अशा परिस्थितीत पिकांकडून पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. पुरेसे पाणी न मिळाल्याने पिके माना टाकत आहेत. काही भागात पिके पिवळी पडू लागली असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

किडींच्या प्रादुर्भावाचे दुसरे संकट

वातावरणात झालेला बदल किडींसाठी पोषक असतो. त्यातच जमिनीतील पाणी कमी झाल्याने कीड वाढते. त्यामुळे सोयाबीन पिकात चक्री भुंगा, कापसावर मावा, तुडतुडे तसेच सोयाबीन, तूर, मूग या पिकांवर पाणे गुंडाळणाऱ्या तसेच रस शोषण करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे.

हा उपाय करा, ८ दिवस पिके तग धरतील

पिकांना पाण्याचा ताण पडत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी १३:०.:४५ या पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. १०० ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट १० मिली पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पिकांच्या मुळाजवळील पाण्याचे बाष्मीभवन कमी होईल. ज्यांची पिके ५५ दिवसांपेक्षा अधिक दिवसांची आहेत त्यांनी २०० ग्रॅम पोटॅशिम नायट्रेट १० मिली पाण्यात मिसळून फवारावे. शक्यतो सकाळच्या वेळेस फवारणी करावी.

शेतात पिकांजवळ उगवलेले तण काढून घ्यावे. त्यामुळे पिकांची पाण्याची गरज भागेल. पाणी उपलब्ध असल्यास संरक्षित पाणी पाळी द्यावी. फवारणी केल्याने पिके किमान ८ दिवस तग धरतील, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ.गजानन गडदे यांनी सांगितले.

१३ ते २० ऑगस्टदरम्यान होईल पाऊस

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन ६ मिली प्रतिदिवस एवढे होत आहे. हे प्रमाण आपल्याकडे अधिक आहे. १३ ते२० ऑगस्ट यादरम्यान हलका पाऊस होईल. सध्याची पिकांची स्थिती पाहता, ४ मिमी एवढा कमी पाऊस झाला तरी तो पिकांसाठी पोषक ठरू शकतो. १३ ऑगस्टपासून हलका पाऊस होण्याची शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञ डॉ.के.के. डाखोरे यांनी सांगितले.