शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
3
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
4
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
5
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
6
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
7
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
8
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
10
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
11
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
12
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
13
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
14
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
15
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
16
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
17
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
18
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
19
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
20
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या खंडाने शेतकऱ्यांचा वाढला घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:22 IST

परभणी : पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सध्या शेतकऱ्यांचा घोर वाढविला आहे. आतापर्यंत झालेल्या दमदार पावसाच्या भरवशावर तरारून आलेली ...

परभणी : पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सध्या शेतकऱ्यांचा घोर वाढविला आहे. आतापर्यंत झालेल्या दमदार पावसाच्या भरवशावर तरारून आलेली पिके आता मात्र पावसाचा ताण सहन होत नसल्याने माना टाकत आहेत. कुठे पिके पिवळी पडत आहेत तर कुठे मावा-तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल झाला आहे. नजरेत जीव ओतून आकाशाकडे पाहत शेतकऱ्यांना आता पावसाची आस लागली आहे.

मागच्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस होत आहे. मात्र, तो वेळेला होत नाही. मागील वर्षी खरिपाची पिके हाता-तोंडाशी असताना झालेल्या अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले होते. हे नुकसान पचवून यावर्षी शेतकरी पेरणीसाठी उभा राहिला. जून महिन्यातच दमदार पाऊस झाल्याने वेळेवर पेरण्या झाल्या. पहिल्या दोन महिन्यांत चांगला पाऊस झाल्याने सध्या पिके तरारलेली आहेत. सोयाबीन, कापसाची वाढ समाधानकारक असून, पहिल्या टप्प्यात पेरणी झालेली पिके सध्या फुलोऱ्यात आहेत. अशा परिस्थितीत पिकांकडून पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. पुरेसे पाणी न मिळाल्याने पिके माना टाकत आहेत. काही भागात पिके पिवळी पडू लागली असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

किडींच्या प्रादुर्भावाचे दुसरे संकट

वातावरणात झालेला बदल किडींसाठी पोषक असतो. त्यातच जमिनीतील पाणी कमी झाल्याने कीड वाढते. त्यामुळे सोयाबीन पिकात चक्री भुंगा, कापसावर मावा, तुडतुडे तसेच सोयाबीन, तूर, मूग या पिकांवर पाणे गुंडाळणाऱ्या तसेच रस शोषण करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे.

हा उपाय करा, ८ दिवस पिके तग धरतील

पिकांना पाण्याचा ताण पडत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी १३:०.:४५ या पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. १०० ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट १० मिली पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पिकांच्या मुळाजवळील पाण्याचे बाष्मीभवन कमी होईल. ज्यांची पिके ५५ दिवसांपेक्षा अधिक दिवसांची आहेत त्यांनी २०० ग्रॅम पोटॅशिम नायट्रेट १० मिली पाण्यात मिसळून फवारावे. शक्यतो सकाळच्या वेळेस फवारणी करावी.

शेतात पिकांजवळ उगवलेले तण काढून घ्यावे. त्यामुळे पिकांची पाण्याची गरज भागेल. पाणी उपलब्ध असल्यास संरक्षित पाणी पाळी द्यावी. फवारणी केल्याने पिके किमान ८ दिवस तग धरतील, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ.गजानन गडदे यांनी सांगितले.

१३ ते २० ऑगस्टदरम्यान होईल पाऊस

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन ६ मिली प्रतिदिवस एवढे होत आहे. हे प्रमाण आपल्याकडे अधिक आहे. १३ ते२० ऑगस्ट यादरम्यान हलका पाऊस होईल. सध्याची पिकांची स्थिती पाहता, ४ मिमी एवढा कमी पाऊस झाला तरी तो पिकांसाठी पोषक ठरू शकतो. १३ ऑगस्टपासून हलका पाऊस होण्याची शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञ डॉ.के.के. डाखोरे यांनी सांगितले.