शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले; पावसामुळे खोळंबल्या रबीच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:42 IST

परभणीत मोठे क्षेत्र राहिले पेरणीविना

- मारुती जुंबडे

परभणी : येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने २०१९-२० या रबी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते; परंतु, परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यात १४ नोव्हेंबरपर्यंत ३.५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. 

गतवर्षी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने रबी हंगामातील २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडीत राहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी हंगामात कोणतेच पीक घेता आले नाही. परिणामी, सर्व शेतकऱ्यांच्या नजरा यावर्षीच्या रबी हंगामाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या मध्यानंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे आजही शेतामध्ये ओल असल्याने रबी हंगामातील पेरणी शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या सध्या तरी रखडल्या आहेत. 

जिल्ह्यात ५.१० टक्के हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली असून गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल आदी पिकांची मात्र अद्यापही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही. येत्या आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर रबी हंगामातील क्षेत्र वाढेल.

परतीच्या पावसाचा सिंचनाला फायदायावर्षी परतीच्या पावसाचे जिल्ह्यात जोरदार आगमन झाल्याने शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जलस्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. परिणामी, या पाणीसाठ्याचा रबी हंगामातील पिकांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सहाजिकच यावर्षीच्या रबी हंगामात हरभरा व गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र