शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले; पावसामुळे खोळंबल्या रबीच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:42 IST

परभणीत मोठे क्षेत्र राहिले पेरणीविना

- मारुती जुंबडे

परभणी : येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने २०१९-२० या रबी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते; परंतु, परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यात १४ नोव्हेंबरपर्यंत ३.५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. 

गतवर्षी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने रबी हंगामातील २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडीत राहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी हंगामात कोणतेच पीक घेता आले नाही. परिणामी, सर्व शेतकऱ्यांच्या नजरा यावर्षीच्या रबी हंगामाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या मध्यानंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे आजही शेतामध्ये ओल असल्याने रबी हंगामातील पेरणी शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या सध्या तरी रखडल्या आहेत. 

जिल्ह्यात ५.१० टक्के हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली असून गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल आदी पिकांची मात्र अद्यापही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही. येत्या आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर रबी हंगामातील क्षेत्र वाढेल.

परतीच्या पावसाचा सिंचनाला फायदायावर्षी परतीच्या पावसाचे जिल्ह्यात जोरदार आगमन झाल्याने शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जलस्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. परिणामी, या पाणीसाठ्याचा रबी हंगामातील पिकांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सहाजिकच यावर्षीच्या रबी हंगामात हरभरा व गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र