शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

परभणीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 16:21 IST

रिलायन्स पीक विमा कंपनीने गैरप्रकार करीत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपषोणाला प्रारंभ केला आहे. 

परभणी : रिलायन्स पीक विमा कंपनीने गैरप्रकार करीत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपषोणाला प्रारंभ केला आहे. 

पंतप्रधान पीक विमा संघर्ष समितीचे समन्वयक डॉ.सुभाष कदम, जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाभरातील शेतकरी परभणीत दाखल झाले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शेतकऱ्यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी संचालनालयाच्या सांख्यिकी विभागाने पीक विम्याचा घटक मंडळ ऐवज तालुका गृहित धरल्याने जिल्ह्याचे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या अविश्वासामुळे क्षेत्रसुधार गुणांक  लावल्याने ५४ कोटी २४ लाख ४२ हजार ३०० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. 

पीक कापणी प्रयोगात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने हलगर्जीपणा केला. तर रिलायन्स पीक विमा कंपनीने बेकायदेशीररित्या हस्तक्षेप करुन कृषी विभागाने दिलेले आकडे न मानता मनमानी पद्धतीने निर्धारित उत्पन्नाच्या आकड्यांचा आधार घेऊन ५० कोटी ८३ लाख ६१ हजार २३२ रुपयांचे नुकसान केले. 

या सर्व प्रकारातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २०५ कोटी ८० लाख ३ हजार ५६८ रुपयांची फसवणूक शासनाने केली आहे. त्यापैकी १४ महसूल मंडळातील ९० हजार शेतकऱ्यांची ५० कोटी ८३ लाख ६१ हजार २३२ रुपयांची फसवणूक विमा कंपनीकडून झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणात आंदोलनकर्त्यांकडून पुरावेही सादर करण्यात आले आहेत. तेव्हा शेतकऱ्यांच्या कोट्यवधींच्या नुकसानी प्रकरणी जिल्हा प्रशासन रिलायन्स कंपनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी या आंदोलकांमार्फत करण्यात आली. जि.प.सदस्य डॉ. सुभाष कदम, श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर, उद्धवराव काळे यांच्यासह जिल्हाभरातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलनादरम्यान आ.डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी