शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत २२ दिवसांनंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य; कृषी आयुक्तांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 15:14 IST

कृषी आयुक्तांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर परभणीत २२ दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देमंत्री महोदयांसमवेत झालेल्या सकारात्मक चर्चेत आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. पीक विमा संघर्ष समितीच्या मागण्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.

परभणी : कृषी आयुक्तांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर परभणीत २२ दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण मागे घेण्यात आले. शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्यांप्रमाणे कार्यवाही केली जाईल, कृषी आयुक्तांचे लेखी आश्वासन बुधवारी तहसीलदारांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

रिलायन्स पीक विमा कंपनीने केलेल्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याने २६ जूनपासून पीक विमा संघर्ष कृती समितीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान चक्का जाम, जिल्हा बंद, धरणे आंदोलनेही करण्यात आले. अखेर २२ दिवसानंतर राज्य शासनाने जिल्ह्यातील आमदार, पीक विमा संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांसमवेत नागपूर येथे बैठक घेतली. या बैठकीत विमा देताना कंपनीने चूक केल्याचे राज्य शासनाने कबूल केले. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्याही मान्य केल्या होत्या.

दरम्यान, बुधवारी कृषी आयुक्त एस.पी. सिंह यांचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी हे पत्र आंदोलकांकडे सुपूर्द केले. मंत्रीमहोदयांसमवेत झालेल्या सकारात्मक चर्चेत आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. पीक विमा संघर्ष समितीच्या मागण्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.

या मागण्या मान्य झाल्याने जिल्ह्यातील सुमारे १ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा होणार आहे. या लेखी आश्वासनानंतर २२ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्याचा निर्णय पीक विमा संघर्ष समितीने घेतला. यावेळी जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास जोगदंड, कॉ.राजन क्षीरसागर, विलास बाबर, जि.प. सदस्य डॉ.सुभाष कदम, सुभाष जावळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीState Governmentराज्य सरकार