शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

अपेक्षा चारशे कोटींची, दिले फक्त ८७ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

नैसर्गिक संकटाच्या कचाट्यातून आपल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टरवरील ...

नैसर्गिक संकटाच्या कचाट्यातून आपल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टरवरील पिकांचा विमा कंपनीकडे भरला होता. यासाठी ३४ कोटी ४४ लाख रुपयांचा हप्ता कंपनीकडे वर्ग केला होता. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे नुकसान पाहून कृषी विभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्यावतीने प्रतिहेक्‍टरी ६ हजार रुपयाची मदत मिळवून दिली. त्यामुळे रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीकडूनही शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांची मोठ्या प्रमाणात मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मदत मिळण्यासाठी ४०० कोटी रुपयांची आवश्यकता होती. मात्र दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आतापर्यंत या विमा कंपनीने १ लाख ४६ हजार ३०१ शेतकऱ्यांना केवळ ८७ कोटी ३२ लाख ४९ हजार रुपयांची मदत दिली आहे. यामध्येही ७७ हजार ८०२ शेतकऱ्यांना ५१ कोटी ५१ लाख ४२ हजार रुपयांचा निधी त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून ४०० कोटी रुपयांच्या मदतीची अपेक्षा असताना, या विमा कंपनीने पहिल्याचवर्षी केवळ ८७ कोटी रुपये देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना मदत देताना आखडता हात

जिल्ह्यातील ३७ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना किमान २८ हजार रुपये, तर कमाल ३४ हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देणे अपेक्षित होते, परंतु बहुतांश मंडळातील बहुसंख्य शेतकऱ्यांना हजार, दीड हजार रुपये रुपयांची मदत करून शेतकऱ्यांच्या संतापात भर घातली आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची तक्रार विमा कंपनीकडे नोंदवली होती; त्यातील दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देताना विमा कंपनीने आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.

लोकप्रतिनिधींची चुप्पी

शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत करताना आखडता हात घेत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी आवाज उठवून विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे भरघोस मदत करण्यासाठी भाग पाडणे गरजेचे असताना परभणीतील लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटना कंपनीच्या मदत वाटपावर मात्र चुप्पी साधून असल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले म्हणून राज्य शासन हेक्‍टरी ६ हजार रुपयांची मदत पावणेदोन लाख शेतकऱ्यांना करते. मात्र दुसरीकडे विमा कंपनी केवळ १ लाख ४६ हजार शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देते. त्यामुळे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे.

माणिक कदम, शेतकरी