शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

लघू व्यावसायिकांचा सुटला संयम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST

परभणी : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोरोनाच्या धोकादायक जिल्ह्यांच्या यादीत परभणी जिल्ह्याचा समावेश नसल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर, शहरातील लघू ...

परभणी : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोरोनाच्या धोकादायक जिल्ह्यांच्या यादीत परभणी जिल्ह्याचा समावेश नसल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर, शहरातील लघू व्यावसायिकांचा संयम सुटला असून, बुधवारी शहरातील मुख्य बाजारपेठ वगळता, इतर भागांत हॉटेल्स, गॅरेज, झेरॉक्स सेंटर आदी दुकाने सुरू करण्यात आली. प्रशासनाकडेही याकडे कानाडोळा केला.

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून संचारबंदी लागू केली आहे. या अंतर्गत किराणा आणि फळ-भाजीचे दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. या आदेशानुसार, आतापर्यंत बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. इतर व्यवहारही ठप्प होते. आदेश डावलून व्यवहार केल्यास पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संबंधित व्यावसायिकाविरुद्ध दंडात्मक कारवाईचा धडाकाही लावला होता.

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हा संसर्ग वाढलेला आहे, तेथेच कडक लॉकडाऊन लावण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले असून, या जिल्ह्यांची यादीही जाहीर केली आहे. त्यात परभणी जिल्ह्याचे नाव नसल्याने, नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि बुधवारी शहरातील वसमत रोड, कारेगाव रोड, जिल्हा स्टेडियम यांसह इतर भागांतील किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने सुरू केली. वसमत रस्त्यावरील वॉशिंग सेंटर, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेज, झेरॉक्स सेंटर्स, चहा विक्रीची काही हॉटेल्स, जिल्हा स्टेडियम परिसरातही हॉटेल्स, केशकर्तनालय, पुस्तक विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली. काही व्यापाऱ्यांनी अर्धे शटर उघडून, तर काहींनी खुलेआम व्यवसायाला प्रारंभ केला. प्रशासनानेही याकडे कानाडोळा करीत कारवाईचा बडगा उगारला नाही. मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठ बंद असल्याने लघू व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. व्यवसायातून उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, दुकानाचे भाडे, वीज मीटरचा किराया, बँकांच्या कर्जाचे हप्ते थकले असून, आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बुधवारी मात्र धोकादायक जिल्ह्यांच्या यादीत परभणी जिल्ह्याचे नाव नसल्याचे समजताच, या किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने सुरू करून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला.

मुख्य बाजारपेठ मात्र कडकडीत बंद

येथील शिवाजी चौक, गुजरी बाजार, कच्छी बाजार, नानलपेठ, गांधी पार्क हा भाग मुख्य बाजारपेठेचा भाग आहे. या भागात मात्र सकाळपासूनच दुकाने कडकडीत बंद असल्याचे पाहावयास मिळाले. सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, भाजी विक्री झाली. त्यानंतर मात्र, दिवसभर या भागात शुकशकाट होता. बंद दुकानांसमोर व्यापारी, त्यांच्याकडील कामगार उभे राहून व्यवसाय करता येतो का, याची काणकूण घेत होते. मात्र, या भागातील परवानगी नसलेल्या इतर व्यावसायिकांनी दुकाने उघडली नाहीत.

शिवाजी चौकात पोलीस बंदोबस्त

बुधवारीही शिवाजी चौक परिसरात पोलीस बंदोबस्त कायम होता. या भागातील चारही रस्त्यांवर पोलीस कर्मचारी उपस्थित होते, शिवाय बाजारपेठ भागातही फिरून दुकान सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जात होती.