शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी सारेच आक्रमक, परभणीत हजारोंचा मुकमोर्चा

By विजय पाटील | Updated: January 4, 2025 17:20 IST

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

परभणी : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील आरोपींना पुण्यात कोणी मदत केली, या आरोपींना मदत करणाऱ्या मंत्र्याला कधी मंत्रिमंडळातून हाकलणार, असे सवाल करीत परभणी येथील मोर्चास संबोधित करणाऱ्या सर्वच नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक टीका केली. तर हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

परभणी येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून १२:३० वाजता काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्ह्यातून आलेले हजारो नागरिक सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नेतेमंडळी व बीड जिल्ह्यातून आलेल्या नेत्यांनीही सहभाग नोंदविला. स्थानिकच्या सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. आजी-माजी अनेक लोकप्रतिनिधी यात सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी विविध फलके हाती घेऊन ही मंडळी सहभागी झाली होती. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचल्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत मान्यवरांची भाषणे झाली.

सर्वांना मकोका लावा : आ. सुरेश धससंगीत दिघोळे ते संतोष देशमुखपर्यंत परळीत किती हत्या झाल्या, त्यामागे कोण आहे, हे तपासण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीहून माणसे पाठविली पाहिजे. तर धनंजय मुंडे मंत्री राहिले तर हे असेच सुरू राहील. त्यांच्याऐवजी परभणीतील राजेश विटेकरांना मंत्री करा, कायंदेंना करा, सोळंकेंना करा, असे आधीच अजित पवारांना सांगितले आहे. 

मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे: आ. संदीप क्षीरसागरबीड जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल होतात. तपास वाल्मीक कराडच्या दिशेने गेला की थांबतो. त्यांच्या काळातले मंत्री त्यांना सांभाळायचे. आताही या प्रकरणाचा तपास होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. सीडीआर तपासून जे दोषी आढळतील, त्यांना फासावर लटकवले पाहिजे.

चार्जशिटमध्ये त्रुटी राहू नये : खा. संजय जाधवया प्रकरणाचा योग्य तपास करून योग्य चार्जशिट दाखल व्हावी. पुराव्याअभावी यांनी अनेक खून पचवले. त्यामुळे अशा त्रुटी राहिल्या नाही पाहिजे. परळीची स्थिती बिहारला लाजवेल, अशी आहे. राजकीय वरदहस्ताने धाडस वाढत चालले. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. तर ज्याचा खून झाला, त्याच्या भावाला धमकी देण्याची ताकद येते कुठून? समाजात खदखद आहे. ती उफाळणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. परळीसारखीच आमच्या गंगाखेडमध्ये स्थिती आहे. मात्र, त्याला आम्ही आवरू.

...तर मुंडेंना रस्त्याने फिरू देणार नाही : मनोज जरांगेसंतोष देशमुख गेलेत. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्याने फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते म्हणाले की, आपल्या समाजाला त्रास झाला तर तोडीस तोड उत्तर द्यायचे. ते जर माणसांचे मुडदे पाडायला लागले तर पर्याय नाही. 

समाजाने असेच पाठीशी राहावे : वैभवी देशमुखसंतोष देशमुख यांची मुलगी वैभवी यावेळी म्हणाली की, आज मला माझ्या वडिलांचा तो हसरा चेहरा दिसत नाही. त्यांना आमच्यापासून हिरावले. त्यांनी समाजासाठी काम केले. आज समाज आमच्या पाठीशी उभा राहिला. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही येथे आलात. असाच तुमचा हात माझ्या व माझ्या भावाच्या पाठीवर कायम राहू द्या. असेच सोबत राहा.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणparabhaniपरभणीSuresh Dhasसुरेश धसSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरSanjay Jadhavसंजय जाधवManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील